इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:सर्वांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*

 सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण




● सरत्या आर्थिक वर्षात 76 लाख 47 हजारांचा नफा ●



*सर्वांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*


परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.


शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केलेला आहे. शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात ठरवलेली सर्वच उद्दीष्टे पुर्ण केली आहेत.पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात 108 कोटी 57लाख रुपयांची अर्थिक उलाढाल केली आहे.40 कोटी 76 लाख रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले असुन ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावरच ही वाटचाल आहे असा विश्‍वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. 

   सन 2022-23 या अर्थिक वर्षाचा ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2023 अखेर संस्थेची अर्थिक स्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी 40 कोटी 76लाख , भाग भांडवल 69 लाख 47 हजार,राखीव निधी 4 कोटी 19 लाख,कर्ज 32 कोटी 58 लाख ,गुंतवणूक 13 कोटी 13 लाख , निव्वळ नफा 76 लाख 47हजार, खेळते भांडवल 48 कोटी 16 लाख तर सीडी रेशीम 66% इतका आहे.

        पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे.  पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रंगनाथ सावजी, रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर वाटचाल सुरु आहे. संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी, व सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्या प्रयत्नातून व सभासद, ग्राहक,कर्जदार,  ठेवीदार यांच्या विश्वासावर पतसंस्थेतील उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या