इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:सर्वांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*

 सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण




● सरत्या आर्थिक वर्षात 76 लाख 47 हजारांचा नफा ●



*सर्वांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*


परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.


शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केलेला आहे. शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात ठरवलेली सर्वच उद्दीष्टे पुर्ण केली आहेत.पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात 108 कोटी 57लाख रुपयांची अर्थिक उलाढाल केली आहे.40 कोटी 76 लाख रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले असुन ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावरच ही वाटचाल आहे असा विश्‍वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. 

   सन 2022-23 या अर्थिक वर्षाचा ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2023 अखेर संस्थेची अर्थिक स्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी 40 कोटी 76लाख , भाग भांडवल 69 लाख 47 हजार,राखीव निधी 4 कोटी 19 लाख,कर्ज 32 कोटी 58 लाख ,गुंतवणूक 13 कोटी 13 लाख , निव्वळ नफा 76 लाख 47हजार, खेळते भांडवल 48 कोटी 16 लाख तर सीडी रेशीम 66% इतका आहे.

        पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे.  पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रंगनाथ सावजी, रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर वाटचाल सुरु आहे. संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी, व सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्या प्रयत्नातून व सभासद, ग्राहक,कर्जदार,  ठेवीदार यांच्या विश्वासावर पतसंस्थेतील उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!