दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:डी. वाय. एफ.आय. परळी तालुका कमिटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

 डी. वाय. एफ.आय. परळी तालुका कमिटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग


परळी / प्रतिनिधी


महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने डी वाय एफ आय परळी तालुका कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि 14 रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरसाळा नगरीतील डॉ. हेमंत कुलकर्णी, डॉ. राहुल शिंदे,डॉ. पवार, डॉ. तौर लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ.ॲड अजय बुरांडे हेते. 


या प्रसंगी डॉ.हेमंत कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रक्तदान केल्याने नविन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते. शरीरात तयार होणाऱ्या नविन रक्तामुळे शुद्ध पेशींची संख्या देखील वाढते. पेशी यांचे काम शरिर निरोगी राखण्याचे असल्याने त्यांच्या वाढीने आपले शरिर निरोगी राहते. पेशींच्या वाढीमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. रक्तप्रवाहात वाढ झाल्याने आपल्या हृदयाच्या समस्या कमी होतात. रक्तदान करण्यात कुठल्याच प्रकारची हानी नसून उलट त्यापासून आपल्याला फायदाच होतो.गरजू रग्णांची रक्ताची निकड पुर्ण होते.असे मार्गदर्शन करताना सांगितले. अध्यक्षीय समारोपमध्ये कॉ. अजय बुरांडे यांनी डी. वाय. एफ.आय. सातत्याने असे रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते समाजाला जागृत करण्यासाठी सतत आयुष्य वेचणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारांना पुढे घेऊन समाजाला जागृत करण्यासाठी काम करणे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या कामांमध्ये पुढे राहणारी ही  संघटना काम करत असते.असे समारोपामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन डी.वाय.एफ.आय.च्या वतीने रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


या रक्तदान शिबीरामध्ये ५० युनिट रक्त हे दान करण्यात आले डी.वाय.एफ.आय.च्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल परळी डी.वाय.एफ.आय.च्या वतीने आभार विजय घुगे यांनी व्यक्त केले तर सुत्रसंचालन मनोज स्वामी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....