दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी





परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

                    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला, डॉ. आंबेडकर हे दिन,दलित, वंचित, शोषितांचा आवाज होते. तर प्राचार्य डॉ. मुंडे यांनी बोलताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व अष्टपैलू होते, ते अर्थतज्ज्ञ,जलतज्ज्ञ, मुकनायक होते. तर प्रा.प्रविण फुटके यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज भारत विश्वगुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा कोण्या ऐका जातीसाठी नव्हता तर तो लढा मानवी मुल्यांचा होता असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.फुटके यांनी तर आभार कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांनी केले. कार्यक्रमास श्री. सुहास कण्व, पांडूरंग किटाळे यांच्यासह शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....