मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी





परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

                    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला, डॉ. आंबेडकर हे दिन,दलित, वंचित, शोषितांचा आवाज होते. तर प्राचार्य डॉ. मुंडे यांनी बोलताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व अष्टपैलू होते, ते अर्थतज्ज्ञ,जलतज्ज्ञ, मुकनायक होते. तर प्रा.प्रविण फुटके यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज भारत विश्वगुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा कोण्या ऐका जातीसाठी नव्हता तर तो लढा मानवी मुल्यांचा होता असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.फुटके यांनी तर आभार कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांनी केले. कार्यक्रमास श्री. सुहास कण्व, पांडूरंग किटाळे यांच्यासह शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....