इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी





परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

                    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला, डॉ. आंबेडकर हे दिन,दलित, वंचित, शोषितांचा आवाज होते. तर प्राचार्य डॉ. मुंडे यांनी बोलताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व अष्टपैलू होते, ते अर्थतज्ज्ञ,जलतज्ज्ञ, मुकनायक होते. तर प्रा.प्रविण फुटके यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज भारत विश्वगुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा कोण्या ऐका जातीसाठी नव्हता तर तो लढा मानवी मुल्यांचा होता असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.फुटके यांनी तर आभार कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांनी केले. कार्यक्रमास श्री. सुहास कण्व, पांडूरंग किटाळे यांच्यासह शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!