इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी





परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

                    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला, डॉ. आंबेडकर हे दिन,दलित, वंचित, शोषितांचा आवाज होते. तर प्राचार्य डॉ. मुंडे यांनी बोलताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व अष्टपैलू होते, ते अर्थतज्ज्ञ,जलतज्ज्ञ, मुकनायक होते. तर प्रा.प्रविण फुटके यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज भारत विश्वगुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा कोण्या ऐका जातीसाठी नव्हता तर तो लढा मानवी मुल्यांचा होता असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.फुटके यांनी तर आभार कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांनी केले. कार्यक्रमास श्री. सुहास कण्व, पांडूरंग किटाळे यांच्यासह शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या