दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:मानूर ग्रामस्थांनी मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावानं केलं लेकीचं जंगी स्वागत

 विचाराची श्रेष्ठता जन्मावर नाही तर आपल्या संस्कार अन् वर्तनावर अवलंबून - पंकजाताई मुंडे





संत वामनभाऊंच्या नारळी सप्ताहात पंकजाताई मुंडे यांनी जिंकली भाविकांची मनं!





मानूर ग्रामस्थांनी मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावानं केलं लेकीचं जंगी स्वागत






मानूर ।दिनांक १३।

आपल्या धर्मामध्ये जो आपल्या अगोदर जन्म घेतो त्याला आपण श्रेष्ठ मानतो पण विचाराची श्रेष्ठता ही जन्मावर नाही तर आपल्यावर झालेले संस्कार, विचार आणि आपल्या वागण्यावर अवलंबून असते. समाजाच्या विकासाची इमारत ढासळू न देणं हे राजकारण्यांचं तर माणसांच्या आत्म्याची, संस्काराची इमारत मजबुत करणं हे अध्यात्माचं काम आहे असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी धर्म आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी परस्परांची व्यासपीठं व्यापू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली.


  संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या परंपरेतील ९१ व्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची सांगता आज भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत मोठया थाटात आणि भक्तीमय उत्साहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन यावेळी पार पडले.


  भगवान गडाप्रमाणेच गहिनीनाथ गड हे देखील माझे श्रध्दास्थान आहे. मी नेहमीच सप्ताहाला उपस्थित रहाते. यंदा मात्र मानूरला येण्याचा कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता. मंत्री असताना मी गडाची वारी कधीही चुकवली नाही. मुंडे साहेबांनी सांगितलेली ही परंपरा काही अपवाद वगळता तेव्हापासून मी चालू ठेवलेली आहे. सत्ता असताना जर मी वेळ काढू  शकते तर सत्ता नसताना मी इथे नक्कीच येऊ शकते असं पंकजाताई म्हणाल्या. धर्म आणि राजकारणाचं व्यासपीठ परस्परांनी व्यापू नये अशी काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे, म्हणून सप्ताहात काही वेळा जावं, काही वेळेस नको अशा भूमिकेत मी असते. संत वामनभाऊंची दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून मी इथे आले. आपल्या धर्मामध्ये जो आपल्या अगोदर जन्मतो त्याला आपण श्रेष्ठ मानतो पण विचाराची श्रेष्ठता ही जन्मावर नाही तर संस्कार, विचार आणि आपल्या वर्तनावर अवलंबून असते. वामनभाऊ कडक शिस्तीचे होते. राजकारण आणि धर्माचा संबंध त्यावेळेस पासून आलेला आहे. समाजाच्या विकासाची इमारत ढासळू न देणं हे राजकारण्यांचं  आहे तर माणसांच्या आत्म्याची, संस्काराची इमारत मजबुत करणं हे अध्यात्माचं काम आहे. ज्याचे संस्कार सक्षम असतात ते लढा देऊ शकतात पण ज्याचे नसतात ते आपली नितीमत्ता रोज बदलत असतात. डोंगरदऱ्यातील माणसं वाम मार्गाला लागू नयेत म्हणून ही परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचं हे मूळयं ही किती मोठी गोष्ट आहे. मुंडे साहेबांच्या पोटी जन्म झाला हे माझं भाग्य आहे, मोठी जबाबदारी आहे, जे भाग्यानं मिळालयं ते जबाबदारीनं टिकवायचंय. संत, महतांच देखील तसंच आहे, मोठया व्यक्तीच्या गादीची परंपरा चालू ठेवणं हे जबाबदारीचं काम आहे असं त्या म्हणाल्या.


भक्त म्हणून गडाची सेवा करीत राहील

-----------

पालकमंत्री असताना तुमच्या लेकीने गडाच्या विकासा करिता २०१८ साली २५ कोटीचा निधी दिला होता, त्यातील दोन कोटीचा निधी वर्गही झाला आणि त्यातून अनेक विकासाची कामं याठिकाणी झाली. राज्य सरकारने आता त्यातलाच जो निधी गडासाठी मंजूर केला आहे तो एकरकमी द्यावा अशी अपेक्षा आहे. गडाची एक भक्त म्हणून तुमच्या प्रेम आणि विश्वासावर पुढेही अशीच सेवा करत राहील असा शब्द यावेळी बोलतांना दिला.


ग्रामस्थांकडून लेकीचं जंगी स्वागत ; मुस्लिम बांधवही सहभागी

-----------

पंकजाताई मुंडे यांचं आज ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढून स्वागत केलं. वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलांची उधळण करतांना ग्रामस्थांचा आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामस्थांसोबतच मुस्लिम बांधवही त्यांच्या स्वागतासाठी मिरवणुकीत मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर पंकजाताईंनी नव्यानेच स्थापन झालेल्या श्रीराम मंदिरात विधीवत पूजा करून दर्शन घेतले तसेच महेबुबा सुबानी दर्ग्यात जाऊन चादर चढवली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....