प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप

आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप



परळी वैजनाथ....."मज्जा केली, धिंगाणा केला, विविध उपक्रमात भाग घेतला आणि कळत नकळत आम्ही शिकत गेलो, आज या आठवणी आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत; परंतु शाळेने मात्र भविष्यातली मोठी शिदोरी आम्हाला दिलेली आहे", अशा भावना इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी बोलताना व्यक्त केल्या. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथील आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना आज शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. इयत्ता नववी मध्ये हे विद्यार्थी आता प्रवेश पात्र असतील. 




इयत्ता आठवीत उपस्थित असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेविषयी अगदी सहजपणे, न लाजता, न भिता इयत्ता पहिलीपासून शिकवलेल्या शिक्षकांविषयी, शाळेविषयी भावना व्यक्त केल्या याबद्दल मुलांचे कौतुक करत शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी आलेला सभाधिटपणा याचे कौतुक करत शाळेतील उपक्रमांचा भविष्यात तुम्हाला निश्चितच उपयोग होईल असे सांगितले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून सूत्रसंचालन कु राधा गुट्टे हिने केले. 

इयत्ता आठवीतील कु अमृता, अंजली, स्वाती, गायत्री, सुनीता, पृथ्वी तसेच मुलांपैकी व्यंकटेश, शिवम, अरुण, हर्षवर्धन, नवनाथ आणि धनंजय यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर तसेच शिक्षक श्री तरुडे, श्रीमती चट, इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक श्री फुटके यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शिक्षकांचे स्वागत केले, प्रास्ताविक श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले. श्री तरुडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आठवी वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्याकडून आम्ही काय शिकलो याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. आभार प्रदर्शनानंतर छोटीशा अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.




Video news 




Advertise 


Video news 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या