प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड

 बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड

परळी (प्रतिनिधी.)   महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतालाच नाही तर या जगातील प्रत्येक माणसाला दिशा देण्याचे महान कार्य केले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील इंदपवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

      इंदपवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई फुलचंद मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.  टाकणखार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, ब्रह्मानंद कांबळे,  नवनाथ जोगदंड, भागवत मुंडे, प्रा. दशरथ रोडे, फुलचंद मुंडे, अभिमान मुंडे, ह. भ. प. भागवत मुंडे, संपत मुंडे, उत्तम रोडे, सोपान जंगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतले परंतु बाबासाहेबांनी पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला.  शैक्षणिक संस्था काढून लाखो विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग तयार केले. त्या वर्गामध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र अंगीकार करून स्वतःचा विकास करावा असे आवाहनही त्यांनी केले.

   यावेळी डॉ. टाकणखार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मध्ये केवळ दारू पिऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांची आणि प्रबोधनाची जयंती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर नवनाथ दाने यांनी यांनी बहुजन समाजाने बाबासाहेबांना स्वीकारल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही असे प्रतिपादन केले. 

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष नवनाथ रोडे, महेश रोडे, राहुल मस्के, गणपत रोडे, आदर्श जंगले, बाबासाहेब जंगले, मुंजा रोडे, बाळू बनसोडे, मल्हार बनसोडे, मिलिंद शिंदे, अनिल शिंदे, करुणा रोडे, मालनबाई रोडे, दैवताला रोडे, मिरा रोडे, अरुणा शिंदे, गवळण जंगले, लक्ष्मण रोडे, ऋषिकेश रोडे, सचिन रोडे, आकाश रोडे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दशरथ रोडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. राजश्री नवनाथ रोडे तर आभार प्रदर्शन पप्पू रोडे यांनी केले. कार्यक्रमास गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या