इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:तब्बल 25 वर्षानंतर भरवली वर्गमित्रांनी शाळा

 ■तब्बल 25 वर्षानंतर भरवली वर्गमित्रांनी शाळा




●वैद्यनाथ विद्यालयाच्यान 97-98 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात 


परळी / प्रतिनिधी


परळी शहरातील जुन्या काळात नावाजलेली शाळा असलेल्या वैद्यनाथ विद्यालयाच्या माधव बाग शाखेतील शैक्षणिक वर्ष 1997-98 साली 10 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 25 वर्षानंतर शाळा भरवून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळेत असताना असलेले वर्ग शिक्षक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शनिवार दि 6 रोजी स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित केला.या स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी शालेय मित्र-मैत्रिणी यांनी एकमेकांची भेट घेतली तेव्हा अनेकांच्या भावना उचंबळून आल्या.


माधव बाग येथील वैद्यनाथ विद्यालयातून शैक्षणिक वर्ष 1997-98 साली उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी ह्या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजण केले होते.शहरातील भागवत मंगल कार्यालयात अतिशय सुसज्ज आणि वाखान्याजोगे असे नियोजन माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.सकाळी 10 वाजता माधव-बाग येथील शाळेत शाळेची घंटा वाजवून शाळा भरविण्यात आली.यावेळी सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वर्ग मित्राने प्रार्थना घेतली.प्रार्थनेनंतर ज्या शिक्षकांचे निधन झाले त्या सर्व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करून वर्ग भरविण्यात आला.यावेळी प्राथमिक वर्गात शिक्षण देणारे श्री.सरवदे सर, श्री.धसकटे सर,श्री.हरंगुळे सर तसेच माध्यमिक शिक्षक श्री.शिंदे सर,श्री.कापसे सर यांच्या सह शालेय कर्मचारी असलेले श्री कुट्टे भावजी आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिक्षकांनी तास घेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले.तदनंतर दुसरे सत्र भागवत मंगल कार्यालय येथे संपन्न झाले यावेळी शालेय जीवनातील विविध अनुभव सांगत गुरुजनांच्या संस्कारामुळे आपण कसे घडलो हे मनोगतातून सांगितले.यानंतर स्नेह भोज करून विविध खेळ खेळून सर्व वर्ग मित्रांनी 25 वर्षांनंतर पुन्हा शालेय जीवनाची मजा लुटली.शालेय शिक्षण पूर्ण करून आपल्या जिवनात शेतकरी,व्यावसायिक,उद्योजक राजकारणी,पत्रकार,नोकरदार , शिक्षक, अधिकारी अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळावात वेळेत वेळ काढून उपस्थिती होती.


■ राज्यभरातून शेकडो किमी अंतर पार करून वर्ग मित्र - मैत्रिणी स्नेह मिलन कार्यक्रमास उपस्थित

■सर्व गुरुजनांचे पुष्प उधळून, औक्षण करून स्वागत

■शालेय विद्यार्थिनी कडून बहारदार सूत्र संचलन

■स्मृती चिन्ह देऊन सर्व गुरुजनांचा यथोचित सन्मान

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या