इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:तब्बल 25 वर्षानंतर भरवली वर्गमित्रांनी शाळा

 ■तब्बल 25 वर्षानंतर भरवली वर्गमित्रांनी शाळा




●वैद्यनाथ विद्यालयाच्यान 97-98 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात 


परळी / प्रतिनिधी


परळी शहरातील जुन्या काळात नावाजलेली शाळा असलेल्या वैद्यनाथ विद्यालयाच्या माधव बाग शाखेतील शैक्षणिक वर्ष 1997-98 साली 10 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 25 वर्षानंतर शाळा भरवून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळेत असताना असलेले वर्ग शिक्षक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शनिवार दि 6 रोजी स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित केला.या स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी शालेय मित्र-मैत्रिणी यांनी एकमेकांची भेट घेतली तेव्हा अनेकांच्या भावना उचंबळून आल्या.


माधव बाग येथील वैद्यनाथ विद्यालयातून शैक्षणिक वर्ष 1997-98 साली उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी ह्या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजण केले होते.शहरातील भागवत मंगल कार्यालयात अतिशय सुसज्ज आणि वाखान्याजोगे असे नियोजन माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.सकाळी 10 वाजता माधव-बाग येथील शाळेत शाळेची घंटा वाजवून शाळा भरविण्यात आली.यावेळी सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वर्ग मित्राने प्रार्थना घेतली.प्रार्थनेनंतर ज्या शिक्षकांचे निधन झाले त्या सर्व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करून वर्ग भरविण्यात आला.यावेळी प्राथमिक वर्गात शिक्षण देणारे श्री.सरवदे सर, श्री.धसकटे सर,श्री.हरंगुळे सर तसेच माध्यमिक शिक्षक श्री.शिंदे सर,श्री.कापसे सर यांच्या सह शालेय कर्मचारी असलेले श्री कुट्टे भावजी आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिक्षकांनी तास घेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले.तदनंतर दुसरे सत्र भागवत मंगल कार्यालय येथे संपन्न झाले यावेळी शालेय जीवनातील विविध अनुभव सांगत गुरुजनांच्या संस्कारामुळे आपण कसे घडलो हे मनोगतातून सांगितले.यानंतर स्नेह भोज करून विविध खेळ खेळून सर्व वर्ग मित्रांनी 25 वर्षांनंतर पुन्हा शालेय जीवनाची मजा लुटली.शालेय शिक्षण पूर्ण करून आपल्या जिवनात शेतकरी,व्यावसायिक,उद्योजक राजकारणी,पत्रकार,नोकरदार , शिक्षक, अधिकारी अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळावात वेळेत वेळ काढून उपस्थिती होती.


■ राज्यभरातून शेकडो किमी अंतर पार करून वर्ग मित्र - मैत्रिणी स्नेह मिलन कार्यक्रमास उपस्थित

■सर्व गुरुजनांचे पुष्प उधळून, औक्षण करून स्वागत

■शालेय विद्यार्थिनी कडून बहारदार सूत्र संचलन

■स्मृती चिन्ह देऊन सर्व गुरुजनांचा यथोचित सन्मान

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....