इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला

 30 लाखाची बोली बोलणं आले अंगलट

अनामत रक्कमेच्या 5 हजाराला लागला  चुना


30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला


अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे ग्रामपंचायत कार्यालयाने कार्यालया लगत चार गाळे बांधलेले असून या गाळ्याचा लिलाव एप्रिल महिन्यामध्ये झाला होता. त्या लिलावामध्ये भावबंदकीच्या चढाओढीत एकाच गाळ्याला तब्बल 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. या बोलीची रक्कम आठ दिवसात भरायची होती. परंतु ती रक्कम वेळेत न भरल्यामुळे तोच लिलाव परत केला. आणि ज्या गाळ्यासाठी 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. तोच गाळा आता फक्त 26 हजाराला सुटला आहे. मात्र आता जी अनामत रक्कमेपोटी पाच हजार भरले होते. त्याला मात्र आता नगदीच चुना लागला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा 4500 लोकसंख्या असलेलं गाव. गावची मतदार संख्या 2300 च्या आसपास. गावच्या ग्रामपंचायतीने गावच्या विकासासाठी व ग्रामपंचायत ला उत्पन्न मिळावे म्हणून ग्रामपंचायत कर्यालया लगत 4 व्यापारी गाळे 10 बाय 10 आकाराचे बांधण्यात आले आहेत. हे गाळे ग्रामपंचायत ने 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने दिलेले आहेत. या गाळ्यात चहाची टपरी, झेरॉक्स, सलून अशी दुकाने आहेत. पुर्वीचा करार संपल्यामुळे ग्रामपंचायतने या चार गाळ्याचा फेर लिलाव केला होता. या लिलावामध्ये शिवाजी काळे यांनी पाच लाखापासुन तीस लाखापर्यंत बोली नेली, माजी उपसरपंच परमेश्‍वर केंद्रे यांनी 26 लाखाची बोली केली होती. गाळा क्रं.1 ला 81 हजार रूपये गाळा क्रमांक 2 ला 54 हजार रूपये, गाळा क्रं. 3 लाख 26 लाख रूपये आणि गाळा क्रमांक 4 ला 30 लाखाची बोलणी झाली होती. यासाठी प्रत्येकी 5 हजार रूपये अनामत रक्कम भरण्यात आली होती.

शिवाजी काळे यांना गाळा क्रं. 4 हा तीस लाखाला सुटला होता.मात्र याची रक्कम मुदतीत न भरल्यामुळे हा लिलाव परत घेण्यात आला. या लिलावामध्ये शिवाजी काळे यांनी पाच हजार रूपये भरले होते आता त्या रक्कमेला त्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे तीस लाखाची बोली बोलणे त्यांना चांगलेच अंगलट आले ओह. फेर लिलावामध्ये श्रीहरी काळे, अरूण मोरे, राम मोरे अपंग गटातून भाऊसाहेब कसबे या चौघा जणांना केवळ 26 हजाराच्या अनामत रक्कमेत 4 गाळे मिळाले आहेत. छोट्याशा खेड्यामध्ये ग्रामपंचायतच्या गाळ्याचा लिलाव तीस लाखाचा झाल्यामुळे याची चर्चा महाराष्ट्राभर गाजली परंतु ही बोली भावबंदकीच्या चढाओढीमध्ये झाल्याचे ग्रामस्थातून बोलल्या जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या