इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला

 30 लाखाची बोली बोलणं आले अंगलट

अनामत रक्कमेच्या 5 हजाराला लागला  चुना


30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला


अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे ग्रामपंचायत कार्यालयाने कार्यालया लगत चार गाळे बांधलेले असून या गाळ्याचा लिलाव एप्रिल महिन्यामध्ये झाला होता. त्या लिलावामध्ये भावबंदकीच्या चढाओढीत एकाच गाळ्याला तब्बल 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. या बोलीची रक्कम आठ दिवसात भरायची होती. परंतु ती रक्कम वेळेत न भरल्यामुळे तोच लिलाव परत केला. आणि ज्या गाळ्यासाठी 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. तोच गाळा आता फक्त 26 हजाराला सुटला आहे. मात्र आता जी अनामत रक्कमेपोटी पाच हजार भरले होते. त्याला मात्र आता नगदीच चुना लागला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा 4500 लोकसंख्या असलेलं गाव. गावची मतदार संख्या 2300 च्या आसपास. गावच्या ग्रामपंचायतीने गावच्या विकासासाठी व ग्रामपंचायत ला उत्पन्न मिळावे म्हणून ग्रामपंचायत कर्यालया लगत 4 व्यापारी गाळे 10 बाय 10 आकाराचे बांधण्यात आले आहेत. हे गाळे ग्रामपंचायत ने 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने दिलेले आहेत. या गाळ्यात चहाची टपरी, झेरॉक्स, सलून अशी दुकाने आहेत. पुर्वीचा करार संपल्यामुळे ग्रामपंचायतने या चार गाळ्याचा फेर लिलाव केला होता. या लिलावामध्ये शिवाजी काळे यांनी पाच लाखापासुन तीस लाखापर्यंत बोली नेली, माजी उपसरपंच परमेश्‍वर केंद्रे यांनी 26 लाखाची बोली केली होती. गाळा क्रं.1 ला 81 हजार रूपये गाळा क्रमांक 2 ला 54 हजार रूपये, गाळा क्रं. 3 लाख 26 लाख रूपये आणि गाळा क्रमांक 4 ला 30 लाखाची बोलणी झाली होती. यासाठी प्रत्येकी 5 हजार रूपये अनामत रक्कम भरण्यात आली होती.

शिवाजी काळे यांना गाळा क्रं. 4 हा तीस लाखाला सुटला होता.मात्र याची रक्कम मुदतीत न भरल्यामुळे हा लिलाव परत घेण्यात आला. या लिलावामध्ये शिवाजी काळे यांनी पाच हजार रूपये भरले होते आता त्या रक्कमेला त्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे तीस लाखाची बोली बोलणे त्यांना चांगलेच अंगलट आले ओह. फेर लिलावामध्ये श्रीहरी काळे, अरूण मोरे, राम मोरे अपंग गटातून भाऊसाहेब कसबे या चौघा जणांना केवळ 26 हजाराच्या अनामत रक्कमेत 4 गाळे मिळाले आहेत. छोट्याशा खेड्यामध्ये ग्रामपंचायतच्या गाळ्याचा लिलाव तीस लाखाचा झाल्यामुळे याची चर्चा महाराष्ट्राभर गाजली परंतु ही बोली भावबंदकीच्या चढाओढीमध्ये झाल्याचे ग्रामस्थातून बोलल्या जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!