दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी

 परळी तालुक्यातील चौपदरीकरणाच्या कामात शेकडो वर्षपूर्वीच्या मोठमोठ्या वृक्षांची तोड



 रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

परळी तालुक्यातील अनेक रस्त्यांचे चौपदरीकरण होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी शेकडो वर्ष वय असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची तोड होत आहे. त्या बदल्यात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

परळी - बीड, परळी - अंबाजोगाई, धर्मापुरी - परळी, परळी - गंगाखेड, परळी - सोनपेठ  या रोडचे रुंदीकरनाचे काम सध्या सुरु असून या रोडवर शेकडो वर्षाचे खूप मोठे मोठे वृक्ष होते ती वृक्ष रस्त्याच्या कामासाठी तोडण्यात येत आहेत. विकास कामे करताना अशा काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु या कारणाने नैसर्गिक गोष्टींची हानी होते आहे. हि होत असलेली हानी भरून काढण्यासाठी पण पाऊल उचलणे गरजेचे आहे. अगोदरच थर्मल पावर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, शेकडो विटभट्या यामुळे परळीकरांना उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. त्यातच शेकडो वर्षाची महाकाय  वृक्ष तोडल्यामुळे या झळा आणखीन वाढणार आहेत. हे सर्व चक्र आटोक्यात अनन्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा तोडणी झाली त्याच्या चौपट वृक्ष लागवड करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती 

संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथराव कळसकर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, मनसेचे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश बारगजे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....