इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:एकही दिवस मतदार संघात प्रचार नाही केला:विनय कुलकर्णींनी मारली बाजी

 एकही दिवस मतदार संघात प्रचार नाही केला:विनय कुलकर्णींनी मारली बाजी


धारवाड  : धारवाड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी विजयी झाले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा त्यांनी पराभव केला. विशेष म्हणजे कुलकर्णी यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आल्याने त्यांनी या मतदारसंघात एकही दिवस प्रचार केला नव्हता.
           विनय कुलकर्णी यांच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. खून प्रकरणी काही महिने ते हिंडलगा कारागृहात होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक उमेदवारी अर्ज भरून देखील जिल्हा बंदीमुळे विनय कुलकर्णी यांना एक दिवसही प्रचार केला नाही. त्यांची पत्नी, परिवाराने व कार्यकर्त्यांनी प्रचार कार्य राबविले. त्यामुळे विनय कुलकर्णी हे निवडून येणार याकडे राज्याचे लक्ष होते. पण एक दिवसही प्रचार न करता विनय कुलकर्णी हे विजयी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्नाटकात काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने १२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ७२, जेडीएस २४ जागांवर आणि अपक्षांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा ११३ आहे. काँग्रेस १२० पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

Advertise 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या