इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

,MB NEWS:अतिक्रमण मालकी हक्क परिषदेत एकमुखी निर्णय

 ■ताबा नको मालकी हक्क द्या-किसान सभेची मागणी

●लाल बावटा सर्वसामान्यांच्या पाठीशी-एड.अजय बुरांडे

अतिक्रमण मालकी हक्क परिषदेत एकमुखी निर्णय


परळी / प्रतिनिधी


"ताबा नव्हे मालकीची नक्कल हवी "या मागणीचा ठराव सहमत करून दि 5 जून रोजी परळी तहसील कार्यालया वरती मोर्चा काढण्याचा एक मुखी निर्णय

किसान सभा व शेतमजूर युनियन च्या वतीने गायरान निवासी अतिक्रमण मालकी हक्क परिषदने आयोजित केलेल्या परिषदेत घेण्यात आला.या परिषदेस माकपचे तालुका सचिव कॉ.गंगाधरराव पोटभरे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन राज्य अध्यक्ष तथा अतिक्रमण प्रश्नाचे गाढे अभ्यासक कॉ. मारोतीराव खंदारे, बीड जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष

कॉ. अॅड. अजय बुराडे,कॉ.मुरलीधर नागरगोजे,कॉ.सुदाम शिंदे, कॉ. अॅड. सय्यद याकूब आदींची प्रमुख उपस्थिती होती.


परळी तहसिलकडून सिरसाळा येथील शेकडो लोकांना अतिकमण निष्कसीत करण्याबाबत नोटीसा दिल्याने सिरसाळ्यातील समस्त अतिक्रमित घर दुकानदार भयभीत झाले आहेत. दारिद्यामुळे खाजगी प्लॅट घेता न आल्याने शासकीय जमिनीवर कुटुंबाना निवारा बांधून गेल्या ३० वर्ष्यापासून हे लोक राहत असून छोटे मोठे धंदे करुन पोट भरत आहेत.या वस्त्यांना ग्राम पंचायतकडून लाईट, नळयोजना रस्ते, नाल्या ई. नागरी सुविधा मिळत असून, सदरील अतिक्रमण धारकांचे नावे मतदार यादीत असून रेशन व्यवस्थेचा बहुतांश लोकांना लाभ मिळत आहे.  अतिक्रमण धारकापैकी शेकडो लोकांची नावे ग्राम पंचायत कार्यालयात भोगवटा रजिस्टर ला लागलेली असून, शेकडो लोकांच्या घरांचे सर्वे ग्राम पंचायतने अनेक वेळा केलेला आहे. तसेच २३१ कुटुंबाना शासनाच्या वतीने इंदिरा आवास योजने अंर्तगत १९८०-८६ दरम्यान रीतसर घरकुले बांधून दिलेली आहेत. खेदाची बाब हि आहे या घरकुलाची नोंद मालकी हक्कात केलेली नाही. याकरिता गेली बारा वर्ष लाल बावट्या जे भोगवटा धारक आहेत त्याला मालकी हक्कातघ्या व अतिककमन धारकास भोगवट्यात नोंद करा अशी मागणी करीत आहे.

याच गायरान जमिनी व गायरान जमिनीवरील घराचे अतिक्रमण नियमित करणे बाबतची परिषद किसान किसान सभा व शेतमजूर युनियन यांच्या वतीने सिरसाळा संपन्न झाली असून या परिषदेत दि 5 जून रोजी परळी तहसीलवर आंदोलनाची हाक दिलेली आहे. या परिषदेत मोठ्या संख्येने सिरसाळा येथील महिला नागरिक तरुण विद्यार्थी सहभागी होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या