मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा

 ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा ॲड.माधव जाधव यांची मागणी





वीज ग्राहकांची हेळसांड थांबवून वीजपुरवठा सुरळीत करावा -ॲड.माधव जाधव यांची मागणी



परळी / प्रतिनिधी दि.११ - ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा.वीज ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवून सतत खंडित होत वीजपुरावठा सुरळीत करावा अशी मागणी किसान कांग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.गेले सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढलेले असतांनाच याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचेही जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे.ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवानाही नियमित वीजपुरवाठा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


महावितरणच्या परळी येथील कार्यालयात साधारण अडीच ते तीन वर्षांपासून पुर्ण वेळ अधिकारी भेटलेला नाही.यामुळे आपत्कालिन सुविधेत मोडणारी महावितरण ची असलेलीही व्यवस्था ढासळत चालली आहे.ज्योतिर्लिंग स्थान असतानाही महावितरण प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही.पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने परळी महावितरण चा बोजवारा उडालेला दिसत आहे.याचा परिणाम थेट वीजवितरण व्यवस्थेवर होत असून पूर्णवेळ अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करावी. बाजारपेठ,गाव भागासह परळी तालूक्यातील वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण महिनाभरात वाढले आहे.यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.


अवकाळी पावसाने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढलेले असून घरातले फॅन - कूलर खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बंदच राहत असून अबाल वॄद्धांचे हाल होत आहेत.अनियमित होणाऱ्या वीजपुरवठ्याने घरातील विद्युत उपकरणांचे नुकसानही होत आहे.वीज ग्राहकांकडुन याबाबत महावितरण कडे चौकशी केली असता ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर महावितरण कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. एकीकडे वीजपुरावठा सुरळीत होत नसतांना दुसरीकडे मात्र याची विचारणा कारणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना महावितरण कडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी.वीज ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करावा.वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे. वरील समस्या न सोडविल्यास आंदोलन करणार असल्याचेही ॲड.माधव जाधव यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....