नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS:ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा

 ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा ॲड.माधव जाधव यांची मागणी





वीज ग्राहकांची हेळसांड थांबवून वीजपुरवठा सुरळीत करावा -ॲड.माधव जाधव यांची मागणी



परळी / प्रतिनिधी दि.११ - ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा.वीज ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवून सतत खंडित होत वीजपुरावठा सुरळीत करावा अशी मागणी किसान कांग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.गेले सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढलेले असतांनाच याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचेही जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे.ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवानाही नियमित वीजपुरवाठा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


महावितरणच्या परळी येथील कार्यालयात साधारण अडीच ते तीन वर्षांपासून पुर्ण वेळ अधिकारी भेटलेला नाही.यामुळे आपत्कालिन सुविधेत मोडणारी महावितरण ची असलेलीही व्यवस्था ढासळत चालली आहे.ज्योतिर्लिंग स्थान असतानाही महावितरण प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही.पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने परळी महावितरण चा बोजवारा उडालेला दिसत आहे.याचा परिणाम थेट वीजवितरण व्यवस्थेवर होत असून पूर्णवेळ अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करावी. बाजारपेठ,गाव भागासह परळी तालूक्यातील वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण महिनाभरात वाढले आहे.यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.


अवकाळी पावसाने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढलेले असून घरातले फॅन - कूलर खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बंदच राहत असून अबाल वॄद्धांचे हाल होत आहेत.अनियमित होणाऱ्या वीजपुरवठ्याने घरातील विद्युत उपकरणांचे नुकसानही होत आहे.वीज ग्राहकांकडुन याबाबत महावितरण कडे चौकशी केली असता ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर महावितरण कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. एकीकडे वीजपुरावठा सुरळीत होत नसतांना दुसरीकडे मात्र याची विचारणा कारणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना महावितरण कडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी.वीज ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करावा.वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे. वरील समस्या न सोडविल्यास आंदोलन करणार असल्याचेही ॲड.माधव जाधव यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या