इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:बारावीत मुलीच हुशार !

 बारावीत मुलीच हुशार !


बीड- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा निकाल 91 टक्के लागला आहे, सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in fchal maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून 12 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88. 13 टक्के लागला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 2.97 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता.14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची टक्केवारी 91.25 एवढी आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल 96.01 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.73 टक्के असून मुलांचा निकाल 89.14 टक्के एवढा आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 4.59 टक्के जास्त आहे.

गुण पडताळणीसाठी २६ मे पासून करा अर्ज

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (http://verification.mhe hsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतरप्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत X ५ जून पासून दुपारी तीन नंतर वितरित करण्यात येतील..

शाखानिहाय निकाल-

विज्ञान - 96.9 टक्के कला – 84.5 टक्के वाणिज्य 90.42 टक्के व्यवसाय अभ्यासक्रम 91.25 टक्के -

विभागानुसार निकाल

पुणे: 93.34 टक्के

नागपूर: 90.35 टक्के

औरंगाबाद : 91.85 टक्के

मुबई: 88.13 टक्के

कोल्हापूर: 93.28 टक्के

अमरावती: 92.75 टक्के • नाशिक: 91.66 टक्के

लातूर: 90.37 टक्के

कोकण: 96.01 टक्के

|

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट