इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे

 शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे




परळी वै.येथील शिवछत्रपती विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकव्या

स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय समुद्रे यांनी डाँ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या  शिक्षणासाठी मोठे योगदान महाराज यांच्या सामाजिक  कायाबदल माहीती दिली आहे .तसेच शाळेतील ,तर

प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे,पत्रकार धीरज जंगले,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी उफाडे हे

उपस्थित होते.

                कार्यक्रमाची सुरूवात 

प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर इंगोले यांनी केले.प्रमुख मार्गदर्शन करताना नवनाथ दाणे यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आरक्षण नावाची संकल्पना पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराज  

यांनी मांडली आणि त्याची अंमलबजावणी आपल्या संस्थानात केली.,स्वस्त धान्य दुकानाची सुरूवात,वस्तीगृहे,कुस्ती आखाडे यांची स्थापना ..जातीपातीला विरोध करून समता प्रस्थापित करण्यासाठी भरघोस कार्य महाराजांनी केले आहे.त्यांच्या विचारांचे वारसदार होऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर समाजकारण 

करायला शिकलं पाहिजे असे विचार आपल्या भाषणातून दाणे यांनी मांडले.  शाळेचा माजी विद्यार्थी रामेश्वर काकडे यांनी शिकागो अमेरिकेतून फोनवर विद्यार्थ्यांना आपले विचार ऐकविले. अध्यक्षीय भाषणात मु.अ.समुद्रे यांनी माणसातील हिरे शोधून त्यांना पैलू पाडण्याचं कार्य केलं ..गोरगरिबांनी शिक्षण मिळावे म्हणून विविध योजना अंमलात आणल्या खऱ्या अर्थाने शाहू महाराज लोकराजा होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धेश्वर इंगोले तर आभार प्रदर्शन गोरख नरारे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक श्री.प्रकाश पाटील,नामदेव ठाकरे,रोहिदास शिंदे, हगारे,विजय खोकले,महादेव बडे,अनिल इंगोले,बापूराव खोतपाटील,अशोक फड,विष्णू तोडकर,अंकुश चव्हाण,सचिन कर्नर,संतोष मेंडके,विश्वास काळे,राजेंद्र कोकाटे,श्रीम.सुहासिनी घोबाळे,सचिन खरात,भाऊसाहेब सोळंके, श्रीम.चेपट, नाना रोडे,कोंडीबा ईबितवार,सिद्राम डाके इ..शिक्षक कर्मचारी ,विद्यार्थी  उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....