दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती

 समर्थ प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार

बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती


◼️ धर्मशील व्यक्ती,समाज व राष्ट्र निर्मितीसाठी उपनयन संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व - वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी



परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२४ - वेदनिष्ठ धर्मशील व्यक्ती,समाज व राष्ट्र निर्मितीसाठी सोळा संस्कारांत उपनयन संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यासाठी केवळ खऱ्या अर्थाने उपनयन संस्कारानंतर अध्ययन,गायत्रीमंत्र पठण व अन्य संस्कारमूल्य जपले गेले पाहिजेत असे प्रतिपादन वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी केले.धार्मिक,संस्कारित पिढी घडावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या समर्थ प्रतिष्ठान द्वारे  सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.


गुरूवार दि.२५ रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर यंदाच्या सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले.श्री वैद्यनाथ दर्शन मंडपात या उपनयनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थीती होती.या उपनयनाचे पौरोहित्य पं.विजय पाठक यांनी केले.संत महंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.


पुढे बोलतांना वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी सांगितले की, धर्माचरणाचे संस्कार हे उपनयना सारख्या संस्कारातून होतात. त्यामुळे आपले सोळा संस्कार हे धर्मसंमत आहेत.अध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या संस्कारांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते.देव,देश आणि धर्म पालनाचे संस्कार यातून रुजवले जातात. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात.त्यामुळे केवळ व्रतबंध करुन सोपस्कार पार न पाडता उपनयन संस्कारानंतरचे आचरण व संस्कारमूल्य जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

◼️ संत महंतांसह मान्यवरांची उपस्थिती

दरम्यान या सोहळ्याला बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज, वे.शा.स.अनंत शास्त्री जोशी,वे.शा.स.सुरेश गुरू चोथवे सोनपेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.यांच्यासह भा.शि.प्र.चे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य,भा.शि.प्र.चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड.रोहित सर्वज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणचे समाजबांधव उपस्थित होते.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....