परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती

 समर्थ प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार

बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती


◼️ धर्मशील व्यक्ती,समाज व राष्ट्र निर्मितीसाठी उपनयन संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व - वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी



परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२४ - वेदनिष्ठ धर्मशील व्यक्ती,समाज व राष्ट्र निर्मितीसाठी सोळा संस्कारांत उपनयन संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यासाठी केवळ खऱ्या अर्थाने उपनयन संस्कारानंतर अध्ययन,गायत्रीमंत्र पठण व अन्य संस्कारमूल्य जपले गेले पाहिजेत असे प्रतिपादन वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी केले.धार्मिक,संस्कारित पिढी घडावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या समर्थ प्रतिष्ठान द्वारे  सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.


गुरूवार दि.२५ रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर यंदाच्या सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले.श्री वैद्यनाथ दर्शन मंडपात या उपनयनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थीती होती.या उपनयनाचे पौरोहित्य पं.विजय पाठक यांनी केले.संत महंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.


पुढे बोलतांना वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी सांगितले की, धर्माचरणाचे संस्कार हे उपनयना सारख्या संस्कारातून होतात. त्यामुळे आपले सोळा संस्कार हे धर्मसंमत आहेत.अध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या संस्कारांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते.देव,देश आणि धर्म पालनाचे संस्कार यातून रुजवले जातात. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात.त्यामुळे केवळ व्रतबंध करुन सोपस्कार पार न पाडता उपनयन संस्कारानंतरचे आचरण व संस्कारमूल्य जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

◼️ संत महंतांसह मान्यवरांची उपस्थिती

दरम्यान या सोहळ्याला बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज, वे.शा.स.अनंत शास्त्री जोशी,वे.शा.स.सुरेश गुरू चोथवे सोनपेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.यांच्यासह भा.शि.प्र.चे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य,भा.शि.प्र.चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड.रोहित सर्वज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणचे समाजबांधव उपस्थित होते.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!