इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:आई - बापाचे छत्र हरवलेले : यशोगाथा- सख्खे भाऊ एकाचवेळी पोलीस दलात

 यशोगाथा- सख्ख्या तीन भावांची एकाचवेळी पोलीस दलात निवड 



परभणी : मातृ-पितृ छत्र हरवल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत मोठया भावाच्या खंबीर साथीने तिन्ही सख्ख्या भावंडानी संघर्ष करीत शिकत राहिली. त्यांच्या या संघर्षाने यशाला गवसनी घालत एकाचवेळी पोलिस दलाच्या सेवेत प्रवेश मिळविला आहे. त्यांच्या या संघर्षमय वाटचालीतून मिळविलेल्या यशामुळे ही भांवडे कौतुकास पात्र ठरली आहेत.
        माखणी (ता. गंगाखेड) सारख्या डोंगरी भागात जमीन जुमला नसल्याने इतरांच्या शेतात मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबात चार मुले असल्याने सातत्याने असलेल्या आर्थिक विवंचनेतून कुटूंब प्रमुखाने पत्नीसह जीवनयात्रा संपवली. त्यानंतर चार मुलांच्या पालनपोषणाचा निर्माण झालेला प्रश्न त्यातीलच मोठया असलेल्या भावाने उचलला. माखणी येथील केशवराव शिसोदे हे पत्नी व चार मुलांसह गावात वास्तव्यास होते. स्वत:ची जमीन नसल्याने इतरांच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवित होते. मात्र सातत्याने आर्थिक विवंचना तोंड द्यावी लागे. या विवंचनेतूनच 2012 मध्ये केशवराव यांनी पत्नीसह जीवनयात्रा संपविली. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर खाली जमीन व वर आकाश अशी पोकळी या चार भावांच्या आयुष्यात निर्माण झाली. सर्वात मोठा मुलगा आकाशने पालकत्वाची भूमिका स्विकारत मोलमजूरी करून या तिघांना शिकविण्याचा निर्धार केला.गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर कृष्णा तसेच आकार आणि ओंकार या जुळ्या भावांना परभणीतील भारत भारती या शाळेत प्रवेश देताना त्यांच्या निवासाची व्यवस्था खानापुर फाटा येथील एका आश्रमशाळेत केली. कृष्णा दहावीपर्यंत तेथे शिकला मात्र आकार व ओंकार हे दोघे सातवीला असतानाच ती आश्रमशाळा बंद पडली. त्यामुळे या दोघांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या या संघर्षाने यशाला गवसनी घालत एकाचवेळी पोलिस दलाच्या सेवेत प्रवेश मिळविला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या