प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

  प्रख्यात सराफा व्यावसायीक रावसाहेब टाक यांचे निधन




अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहरातील मंडईबाजार भागात पाटील चौकातील प्रगती ज्वेलर्सचे सराफी पेढीचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब टाक यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने शुक्रवारी सकाळी 8 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 52 वर्षाचे होते. 

शहरातील पाटील चौकातील मंडई बाजारात मुख्य बाजार पेठेत सराफी पेढीचे मोठे दालन होते. आज पहाटे पासुनच टाक यांना शोशनाचा त्रास होवू लागला होता. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल केले असला त्यांना तिव्र स्वरूपाचा धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली रावसाहेब टाक हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर सुरूवातीच्या काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. तालुक्यातील मौजे येल्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. पुढे नौकरीत मन लागेला म्हणून व्यावसायात झेप घेत नौकरी सोडून धाडसाने सराफी व्यवसाय वाढविला. आपली विनयशिल वागणूक आणि सहानुभूतीपुर्ण वर्तवणूकीच्या बळावर त्यांनी शहरातील मुख्य बाजार पेठेत अद्यावत असे सराफी दालन बनविले. या शिवाय शहरातील विविध भागात प्रत्येक भावांना स्वतंत्र सराफी दुकान निर्माण करून दिले. यांच्या आकाली निधनामुळे व्यापारी वर्ग सामाजिक व राजकिय कार्यकर्त्यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड, प्रतिष्ठीत व्यापारी बापु टाक, आश्रुबा टाक हे दोघे बंधु असून त्यांचा मोठा परिवार आहे. रावसाहेब टाक यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या