युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ससेहोलपट थांबवावी अन्यथा पुन्हा एल्गार ; काॅ.एड. अजय बुरांडे

 ■ कोरड्या घोषणांचा सुकाळ; शेतकऱ्यांच्या माथी मात्र कायम दुष्काळ


● शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ससेहोलपट थांबवावी अन्यथा पुन्हा एल्गार ; काॅ.एड. अजय बुरांडे


परळी / प्रतिनिधी


मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असताना किसान सभेच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर राज्य सरकारने सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दीड हजार कोटी रुपयाच्या मदतीची घोषणा केली खरी; पण ही मदत केव्हा वितरित होणार हा प्रश्नच अनुत्तरितच आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीसाठी केलेल्या संघर्षांती राज्य सरकारने मोठ्या अविर्भावात डांगोरा पीठून मदतीची घोषणा केली; पण या मदतीपासून निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी अजूनही वंचित आहेत. ही मदत कधी शेतकऱ्यांना मिळेल याचे ना शासन ना प्रशासन कुणीही उत्तरदायित्त्व घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही की साधं बोलायला तयार नाही. म्हणून या घोषणा 'बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी' होऊ नयेत म्हणून किसान सभा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.


शेतकऱ्यांना छळणाऱ्या शेतमालाचे भाव पाडणाऱ्या लॉबीला पाठीशी घालून शेतकरी विरोधी धोरणे राबवणाऱ्या शासनकर्त्यांना किसान सभा रस्त्यावर उतरून जवाब विचारणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपी च्या किमती निम्म्यावर उतरल्या असताना आपल्याकडेच खताच्या किमती दुपटीने कशा वाढल्या? आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस सोयाबीन चे वायदे बाजार चांगले असताना आपल्याकडेच किमती कशा घसरल्या? ऐन पेरणीच्या तोंडावर निर्धास्त बोगस बियाण्यांचा काळाबाजार मांडून शेतकऱ्यांच्या मढ्यावरले लोणी चाटणारे आज कसे बोकाळतायत! याला जबाबदार कोण?  केवळ शेतकऱ्याचा पुळका दाखवून शेतकरी सन्मानाच्या नावावर दोन दोन हजाराची बोळवण करून 'आवळा देऊन कवळा काढण्याचा' हा कसल्या लुटीचा प्रकार आहे? यावर शासन कर्त्याना कुणी बोलणार नाही. जवाब विचारणार नाही, असे राज्यकर्त्यांनी समजू नये. असा इशारा किसान  सभेच्यावतीने देण्यात आला आहे.


उसाच्या एफ आर पी ची घोषित किंमत शेतकऱ्यांना एक रकमी मिळणे अपेक्षित असताना त्या एफ आर पी चे तुकडे केले जात आहेत, मान्सून लांबल्याच्या व खरीप पेरणीच्या पार्श्वभूमीवर ही एफआरपीची उर्वरित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश संबंधित ऊस कारखान्यास देऊन शिल्लक राहिलेले उसाचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत यासाठी किसान सभा एल्गार पुकारणार असल्याचे बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या