परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संविधान समता दिंडीची पंढरपुरात सांगता

 संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न संविधानामूळेच साकार होईल -शामसुंदर महाराज सोन्नर 

संविधान समता दिंडीची पंढरपुरात सांगता

पंढरपूर (प्रतिनिधी) : जात-धर्म,  स्री-पुरुष हे सर्व भेद  विसरून सामाजिक ऐकायाचं  देखण रूप पंढरीची वारीमध्ये पहायला मिळतं. द्वेष, मत्सराचा लवलेशही कुठे दिसत नाही. पंढरीच्या दिंडीत दिसणारा हा एकोपा जेव्हा प्रत्येक गावात दिसेल तेंव्हा संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न साकार होईल. ते संतांनी पाहिलेले स्वप्न फक्त संविधानामूळेच सत्यात येईल, असे प्रतिपादन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी पंढरपूर येथे केले. संविधान समता दिंडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

समता भूमी फूलेवाडा येथून निघालेल्या संविधान समता दिंडीचा समारोप पंढरपूर येथील घेरडीकर मठात झाला. अध्यक्षस्थानी भारत महाराज घोगरे गुरुजी होते. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या संविधान मूल्यांच्या पाऊल खूणा आपल्याला संत साहित्यात जागोजागी पहायला मिळतात. पंढरीच्या वारीमध्येही त्याचाच अविष्कार दिसतो. हा संतांनी पेरलेल्या समतेच्या विचारांचा विजय आहे. पंढरीच्या वारीतील हा समतेचा विचार गावागावात पोहोचेल तेव्हाच संतांनी पाहिलेल्या आनंदी समाजाचे स्वप्न साकार होईल. तो आनंदी दिवस संविधानामूळेच पहायला मिळेल आसा आशावाद शामसुंदर महाराज यांनी व्यक्त केला.

संविधान समता दिंडी मागील संकल्पना संविधान प्रचारक संदीप बर्वे यांनी विषद केली. संविधान प्रचारक महेंद्र रोकडे, गुरुदेव संप्रदायाचे ज्ञानेश्वर रक्षक प्रमुख पाहुणे म्हणूनउपस्थित होते.   सूत्रसंचालन समाधान महाराज देशमुख यांनी केले. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!