प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी आत्मलिंग शेटे यांची निवड 



परळी वै.(प्रतिनिधी):- परळी येथील विरशैव समाजाचे युवा नेते तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची लिंगायत संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या आदेशावरुन प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे यांनी लेखी नियुक्ती पत्र देऊन लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.

आत्मलिंग शेटे हे पुर्वीपासूनच लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक होते. त्यांची सामाजिक कार्याची आवड व कार्य असल्यामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याचे मा.काकासाहेब कोयटे यांनी दुरध्वनी वरुन बोलतांना सांगितले व आत्मलिंग शेटे यांचे अभिनंदन केले.

आत्मलिंग शेटे यांची विरशैव लिंगायत समाजामध्ये गेली 20 वर्षापासून ते कार्यरत आहेत. लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने परळी येथे दि.15/7/2014 ला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा काढला होता. या मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता तसेच 2014 मध्ये कराड येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन व मोर्चा मा.काकासाहेब कोयटे, सुनीलशेठ रुकारी यांच्या नेतृत्वात झालेल्या मोर्चात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तसेच 2005 मध्ये सोनपेठ येथे झालेल्या पंच जगदगुरु सोहळ्यातही सचिव म्हणून चांगली कामगिरी बजावली होती. त्यांना 2014 मध्ये लातूर येथे झालेल्या राज्य बसव मेळाव्यामध्ये प्रा.सुदर्शन बिरादार व इतर मान्यवरांच्या हस्ते ‘समाजभुषण पुरस्काराने’ गौरविण्यात आले होते. नांदेड येथील बसवेश्वर समता परिषदेच्या वतीने ‘बहुजनरत्न पुरस्कार’ देण्यात आला होता. आत्मलिंग शेटे यांनी लिंगायत संघर्ष समितीच्या माध्यमातून आणखीन जोमाने कार्य करावे, संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शहर व तालुका अध्यक्षाची नेमणुक करावी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात आम्ही उपस्थित राहुत असे आवाहन महाराष्ट्र लिंगायत समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे यांनी केले आहे.

आत्मलिंग शेटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे विरशैव समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. आत्मलिंग शेटे यांना नियुक्तीपत्र देत असताना सर्वश्री साई पतसंस्था कळंबचे चेअरमन सागर मुंडे, निलेश होनराव, वैजनाथ गुळवे, रामलिंग ढेले इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या