इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

 नगर परिषद आणि वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने दिंडीतील वारकर्यांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात :-गोपाळ आंधळे 



परळी वैद्यनाथ दि.८(प्रतिनिधी)वारकर्यांचं  आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा आषाढी पालखी सोहळा दि.२९ जून रोजी आहे. त्यानिमित्त प्रभु श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री विदर्भ आणि मराठवाड्यातून शेकडो दिंड्या परळीत दाखल होत असतात. या वारकर्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. त्यामुळे परळी नगर परिषद आणि वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने या भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात  सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे तालूका अध्यक्ष गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे केली आहे. 

  दोन वर्षाच्या कोरोना संकटा नंतर यावर्षी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा आषाढी पालखी सोहळा होत आहे .या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. पंढरपूर कडे जाणार्या पालख्यांपैकी शेकडो पालख्या या ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ येथून पुढे जात असतात. यामध्ये शेगावचे श्री गजानन महाराज, विदर्भातील ज्ञानेशकन्या  श्री संत गुलाब महाराज, संत जनाबाई यासह शेकडो छोट्या मोठ्या दिंड्या परळी शहरात मुक्कामी दाखल होत असतात. या दिंडीतील वारकर्यांना अनेक वेळा वैद्यनाथ मंदिर परिसरात उखड्यावर, रस्त्यावर, पायर्यांवरच झोपावे लागते, स्नानाची,शौचालयाची पण हिच परिस्थिती  असते. त्यामुळे परळी नगर परिषदेने मंदिर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात स्नानासाठी आडोसा आणि फायबरचे शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच  धर्मवीर  छञपती संभाजी महाराज चौक, शामाप्रसाद  मुखर्जी उड्डाण पुल, रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टावर चौक,स्टेशन रोड  ते मंदिर पर्यंत रस्ता किमान आषाढी पर्यंत रोज दोन वेळा स्वछ करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला किटक नाशक पावडर टाकावी. पोलिस प्रशासनाने रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दुर करून प्रत्येक दिंडी सोबत कर्मचारी व्यवस्थे साठी नियुक्त करावेत. वैद्यनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने वारकर्यांसाठी भक्त निवास, मंगल कार्यालय आणि पार्किंग झोन मध्ये मंडप उभारून भावीकांची सोय करावी. तर शहरातील सामाजिक संस्था, राजकीय संघटनेच्या पदाधिकार्यानी भावीकांच्या स्वागतासाठी चौका चौकात स्वागत कमानी उभ्या कराव्यात.त्यांच्या फराळाची, जेवनाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.  शहरातील खाजगी मंगल कार्यालय चालकांनी पण पंधरा दिवस आपल्या मंगल कार्यालयात भावीकांना रहाण्याची सोय करावी. पालखी सोहळा ही महाराष्ट्राची धार्मिक अस्मिता आहे. तिचा सन्मान व सुविधा उपलब्ध करणं ही प्रत्येक हिंदू चे कर्तव्य समजून आपण आपल्या गावात वारकर्यांसाठी आप आपल्या परीने जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करूत. हीच खर्या अर्थाने पांडुरंगाची सेवा ठरेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....