परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी

 परळीच्या उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रस्ता मजबुतीकरण करावे

अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी


जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना दिले निवेदन



बीड दि. 6

         परळी शहरातील शिवाजीनगर जवळ असलेल्या डॉ .शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोडवरून मोठ्या प्रमाणात 12 टायर ट्रक मालवाहतूक करतात त्यामुळे येथील परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे येथील रस्त्याचे मजबुतीकरण करावे आणि या भागातील नागरिकांना आरोग्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केली. दरम्यान अॅड. संकाये यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

            परळी शहरात असलेल्या उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट रोडवरून रेल्वेचा माल आठवड्यातून चार ते सहा वेळेस येतो तो माल खाली करण्यासाठी ट्रक चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे तेथील परिसरात प्रदूषण होत आहे. धूळ उडत असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. या धुली कणांमुळे नेहमी सर्दी होणे, खोकला, अंगदुखी ताप यासारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत. प्रदूषणामुळेच असे आजार होतात. त्यातच मोठे वाहने त्या रोडवरून मालवाहतूक करत असताना धुलीकन हवेत पसरतात हवेत धुलीकन पसरल्यामुळे समोर आलेले वाहने दिसत नाहीत त्यामुळे उड्डाणपुलाजवळ अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. आजारांमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण करावे आणि नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी अॅड. मनोज संकाये यांनी केली.

          बीड येथील शासकीय विश्रामगृहावर संकाये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. 


*जिल्हाधिकारी यांना निवेदन*

         दरम्यान आपण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याने अॅड. मनोज संकाये यांनी आज बीड येथे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले .यावेळी जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .

        पत्रकार परिषद आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना अॅड. मनोज संकाये यांच्यासोबत जोशी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ज्ञानदेव आंबुरे, राहुल कांदे, शिवा बडे, बालासाहेब चाटे, काशिनाथ सरवदे, सुदंर आव्हाड, बालाजी गुट्टे, शिवाजी मुंडे, लक्ष्मण बोले आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!