युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी

 परळीच्या उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रस्ता मजबुतीकरण करावे

अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी


जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना दिले निवेदन



बीड दि. 6

         परळी शहरातील शिवाजीनगर जवळ असलेल्या डॉ .शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोडवरून मोठ्या प्रमाणात 12 टायर ट्रक मालवाहतूक करतात त्यामुळे येथील परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे येथील रस्त्याचे मजबुतीकरण करावे आणि या भागातील नागरिकांना आरोग्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केली. दरम्यान अॅड. संकाये यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

            परळी शहरात असलेल्या उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट रोडवरून रेल्वेचा माल आठवड्यातून चार ते सहा वेळेस येतो तो माल खाली करण्यासाठी ट्रक चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे तेथील परिसरात प्रदूषण होत आहे. धूळ उडत असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. या धुली कणांमुळे नेहमी सर्दी होणे, खोकला, अंगदुखी ताप यासारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत. प्रदूषणामुळेच असे आजार होतात. त्यातच मोठे वाहने त्या रोडवरून मालवाहतूक करत असताना धुलीकन हवेत पसरतात हवेत धुलीकन पसरल्यामुळे समोर आलेले वाहने दिसत नाहीत त्यामुळे उड्डाणपुलाजवळ अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. आजारांमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण करावे आणि नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी अॅड. मनोज संकाये यांनी केली.

          बीड येथील शासकीय विश्रामगृहावर संकाये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. 


*जिल्हाधिकारी यांना निवेदन*

         दरम्यान आपण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याने अॅड. मनोज संकाये यांनी आज बीड येथे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले .यावेळी जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .

        पत्रकार परिषद आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना अॅड. मनोज संकाये यांच्यासोबत जोशी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ज्ञानदेव आंबुरे, राहुल कांदे, शिवा बडे, बालासाहेब चाटे, काशिनाथ सरवदे, सुदंर आव्हाड, बालाजी गुट्टे, शिवाजी मुंडे, लक्ष्मण बोले आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या