प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 8 वेळा दिली एमपीएससीची परिक्षा: अपयश आल्याने नैराश्यातून तरूणाने केली आत्महत्या




महाविद्यालयीन पदवी प्राप्त केल्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन एमपीएससीचा अभ्यास करून देखील आठ वेळा या परिक्षेत यश न आल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील चाळीस वर्षीय युवकाने शेतातील ऊसामध्ये विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपविले. ज्ञानेश्‍वर आण्णासाहेब आपेट या असे या तरूणाचे नाव आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील ज्ञानेश्‍वर आण्णासाहेब आपेट याने वयाच्या 22 व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन एमपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी पुणे येथे स्थायीक झाला. त्याने आत्तापर्यंत आठ परिक्षा एमपीएससीच्या दिल्या. परंतु एकाही परिक्षेत यश न आल्यामुळे तो हाताश झाला होता. 19 जून रोजी आपल्या शेतातील ऊसाच्या सरीमध्ये विषारी औषध प्राशन केले. 20 जून रोजी ऊसातील ड्रीप बदलण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याला सदरील युवकाचा मृतदेह आढळून आला. या नंतर बर्दापुर पोलिसांना याची माहिती देवून रितसर पंचनामा करण्यात आला. स्वाराती रूग्णालयात उत्तरणीय तपासणी केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. एमपीएससी परिक्षेत अपयश आल्यामुळे त्या नैराश्यातून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकत्याच मे महिन्यामध्ये लागल्या एमपीएससीच्या निकालात देखील त्याला यश न आल्यामुळे त्याने थेट टोकाचे पाऊल उचचले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या