MB NEWS:विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश
विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश
मार्च २०२३चा माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यात विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.विद्यालयाचा निकाल ९९.११℅ लागला आहे.
२२६ विद्यार्थ्यांपैकी १९३ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.यात ९५% वर गुण घेणारे ४४ विद्यार्थी असून ९०% ते ९५% दरम्यान
गुण घेणारे ६५ विद्यार्थी आहेत.संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ५२ विद्यार्थी असून गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे०६ विद्यार्थी आहेत.
शाळेतील गुणानुक्रमे पाहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाण
१ कु भाग्यश्री बालाजी होळंबे ९९.६०
२ कु राधिका मदन कराड ९९.२०
३चि ओंकार रामेश्वर मंत्री ९८.८०
४कु आरती पांडुरंग कराड ९८.८०
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता भदाणे , उपाध्यक्ष मा अवचार , सचिव पी जी ईटके,संस्थेचे सदस्य कोळगे, भिंगोरे, एम टी मुंडे, पैंजणे, सावन्त, चेवले,औष्णिक विद्युत केंद्राचे कल्याण अधिकारी वंजारी,परळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कनाके माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उन्मेष मातेकर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नांदूरकर सुमठाणे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा