अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकीसारखी राबवणार - धनंजय मुंडे
मुंबई.....
राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करुन ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होईल तसेच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होईल.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे,आमदार शेखर निकम, वित्त, सामान्य प्रशासन, नियोजन, उच्च व तंत्रशिक्षण तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू (व्हीसीद्वारे) उपस्थित होते.
कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीने राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटीका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
•••
VIDEO NEWS GALLERY
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा