इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

 वेगाने राजकीय घडामोडी: अजितदादा राजभवनात




बीड : राज्यात अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या असून आजच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल असे सांगितले जात असून बीड जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच आपल्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार उपस्थित असून 'बैठक संपल्यावर अजित पवार राजभवनात जाणार असल्याचीही माहिती आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी किंवा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात येणार असून मागच्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात बीड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते मात्र यावेळी बीड तील एक नेता मंत्री म्हणून शपथ घेणे मानले जात आहे. त्यामुळे आता नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या