परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य

 जिल्हा विभाजनाचे निकष शासनाने जाहिर करावे; नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य-अ‍ॅड.अतुल तांदळे




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्या सोशल मिडीयावर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीबाबत एक पत्र फिरवले जात आहे. या अनुषंगाने शासनाने जिल्हा विभाजनाचे निकष जाहिर करावे तसेच शासकीय समितीचा अहवाल देखील सार्वजनिक करावा अशी मागणी परळी जिल्हा निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी केली आहे. नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी केले.


 गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमांवर बीड जिल्हा विभाजनाबाबत चर्चांना उधाण आले आहे. याबाबत जिल्हा निर्मिती कृती समितीने संबंधीत यंत्रणेकडे चौकशी केली असता महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती बाबत शासनाकडे कोणतेही स्वरुपाचे निकष नसल्यामुळे मा.अप्पर सचिव (महसुल) यांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या जिल्ह्याचे विभाजन करुन नविन जिल्हा निर्मिती करण्याबाबत कोणते निकष असावे यासाठी एक समिती नेमली होती. याबाबत समितीने आपला अहवाल शासनकडे दिला असल्याचे समजते. शासनाने निकषास मान्यता दिल्यानंतर निश्‍चित केलेल्या निकषाप्रमाणे महाराष्ट्रात नवीन जिल्हा निर्मिती बाबत प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी दिली आहे. तसेच नविन जिल्हा निर्मितीसाठीचे निकष शासनाने जाहिर करावे अशी मागणी देखील अ‍ॅड. तांदळे यांनी केली आहे.  यासर्व पार्श्‍वभूमीवर अकारण होत असलेल्या चर्चा या निव्वळ व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!