अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

तेव्हा अभिनेता सुनील शेट्टी झोपलेला असतो का? : डॉ. संतोष मुंडे

 टमाट्याला भाव मिळत नाही तर 'लाल चिखल' होतो तेव्हा अभिनेता सुनील शेट्टी झोपलेला असतो का? : डॉ. संतोष मुंडे




डॉ. संतोष मुंडे सुनील शेट्टीला पाठवणार टोमॅटोचे पार्सल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) टमाट्याचे वाढलेले भाव बघून काही शेतकरीद्रोहींच्या पोटात गोळा उठला आहे. टमाट्याचे किंमतीबाबत सुनील शेट्टीने केलेल्या वक्तव्याची निंदा करत सामाजिक कार्यकर्ते डॉ.संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टीला टमाट्याचे पार्सल पाठवून त्याचा प्रतिकात्मक निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.


सुनील शेट्टी एका मुलाखतीत म्हणाला की "टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचा परिणाम माझ्या स्वयंपाकघरावरही होऊ लागला आहे. आम्ही ताजे उगवलेले अन्न खाण्यावर विश्वास ठेवतो. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो कमीच खातो. लोकांना वाटेल की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते.”


लेखक भास्कर चंदनशिवे त्यांच्या 'लाल चिखल' कथेत म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा रुपया, दोन रुपये किलो भाव टमाट्याला असतो तेव्हा कोणी शेतकऱ्यांच्या कष्टाची पर्वा करत नाही. कधी कधी पडेल भावात माल विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलतो. तेव्हा कोणी कोणी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाही. तेव्हा सुनील शेट्टी सारखे लोकं झोपलेले असतात का? असा संतप्त सवाल डॉ. संतोष मुंडे यांनी केला आहे.


एकेका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणाऱ्या सुनील शेट्टीकडे हमर एच3, मर्सिडीज-बेंज एसयूवी, टोयोटा प्राडो, लैंड क्रूजर, जीप रैंगलर अशा महागड्या गाड्यांसाठी पैसे असतात. त्याच्या एच टू ओ वॉटर पार्कमध्ये प्रवेश शुल्क एका व्यक्तीसाठी हजारो रुपये घेतले जाते. त्याचे काही हॉटेल्सही आहेत फक्त त्यातून सुमारे शंभर करोड रुपये वर्षाला कमावतो आणि कधी नाही ते शेतकरी चार पैसे कमवत असला तर त्याच्या सारख्या शेतकरीद्रोही लोकांच्या पोटात दुखते. त्यामुळे त्याला डॉ. संतोष मुंडे हे टमाट्याचे पार्सल पाठवणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या