नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

 परळीकरांचा दणका : डाॅ.संतोष मुंडेंचे पार्सल पडले भारी; सुनील शेट्टीने मागितली शेतकऱ्यांची माफी



               टोमॅटोच्या किंमती गगनात भिडल्या असताना अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती.पण त्यावर आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याने त्यांची माफी मागितली आहे.
    सुनील शेट्टीची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे, काही दिवसांपूर्वीच सूनीलने टोमॅटो आणि त्यांच्या वाढत्या किमतीवर विधान केले होते. सुनील शेट्टीने नुकतेच टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. जेव्हा अभिनेत्याने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले तेव्हा सोशल मीडियावर त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. याच कारणामुळे सुनील शेट्टीला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता ट्रोलिंगला कंटाळलेल्या अभिनेत्याने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
       टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर आपले मत व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, या गोष्टीचा परिणाम त्याच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या आधीच्या विधानात म्हटले होते की त्याने अलीकडे टोमॅटोचा वापर कमी केला आहे. यानंतर त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. अभिनेत्याचे वक्तव्य व्हायरल होताच अनेक शेतकऱ्यांनी त्याचा निषेध केला. इतकंच नाही तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष मुंडे यांनी अभिनेत्यावर टीका केली आणि त्याला विरोध करत सुनीलला टोमॅटोही पाठवले. या सर्व गोष्टींचा सूनील शेट्टीला मोठा धक्का बसला आहे.एका रिपोर्टनुसार सुनील शेट्टीने आता शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. तो म्हणाला, 'माझा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक धारणा बाळगण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांच्या पाठिंब्याने मी नेहमीच काम केले आहे. आम्ही आमच्या स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करावा अशी माझी इच्छा आहे. त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना नेहमी मिळावा असे मला वाटते.सुनील पुढे म्हणाला, 'शेतकरी हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. हॉटेल व्यावसायिक या नात्याने माझे त्यांच्याशी नेहमीच थेट संबंध राहिले आहेत. माझ्या कोणत्याही विधानाने, जे मी बोललोही नाही, त्याने त्यांना दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचे स्वप्नही मी पाहू शकत नाही. कृपया माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या