मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

 परळीकरांचा दणका : डाॅ.संतोष मुंडेंचे पार्सल पडले भारी; सुनील शेट्टीने मागितली शेतकऱ्यांची माफी



               टोमॅटोच्या किंमती गगनात भिडल्या असताना अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती.पण त्यावर आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याने त्यांची माफी मागितली आहे.
    सुनील शेट्टीची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे, काही दिवसांपूर्वीच सूनीलने टोमॅटो आणि त्यांच्या वाढत्या किमतीवर विधान केले होते. सुनील शेट्टीने नुकतेच टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. जेव्हा अभिनेत्याने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले तेव्हा सोशल मीडियावर त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. याच कारणामुळे सुनील शेट्टीला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता ट्रोलिंगला कंटाळलेल्या अभिनेत्याने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
       टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर आपले मत व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, या गोष्टीचा परिणाम त्याच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या आधीच्या विधानात म्हटले होते की त्याने अलीकडे टोमॅटोचा वापर कमी केला आहे. यानंतर त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. अभिनेत्याचे वक्तव्य व्हायरल होताच अनेक शेतकऱ्यांनी त्याचा निषेध केला. इतकंच नाही तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष मुंडे यांनी अभिनेत्यावर टीका केली आणि त्याला विरोध करत सुनीलला टोमॅटोही पाठवले. या सर्व गोष्टींचा सूनील शेट्टीला मोठा धक्का बसला आहे.एका रिपोर्टनुसार सुनील शेट्टीने आता शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. तो म्हणाला, 'माझा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक धारणा बाळगण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांच्या पाठिंब्याने मी नेहमीच काम केले आहे. आम्ही आमच्या स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करावा अशी माझी इच्छा आहे. त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना नेहमी मिळावा असे मला वाटते.सुनील पुढे म्हणाला, 'शेतकरी हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. हॉटेल व्यावसायिक या नात्याने माझे त्यांच्याशी नेहमीच थेट संबंध राहिले आहेत. माझ्या कोणत्याही विधानाने, जे मी बोललोही नाही, त्याने त्यांना दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचे स्वप्नही मी पाहू शकत नाही. कृपया माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....