इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

 सदोष व निकृष्ट बियाणांमध्ये नुकसान शेतकऱ्यास झाल्यास भरपाई देण्याची तरतूद करा- वसंत मुंडे



 परळी (प्रतिनिधी)

  महाराष्ट्र मध्ये २०१९ पासून आजतागायत अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना बोगस निकृष्ट बी बियाणे,खत,औषधी पुरवून करोडो रुपयांना लुटले.नुकसान झालेल्या शेतकर्यांना कायद्यात भरपाईची तरतुद करावी अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.

 माजी कृषिमंत्री दादा भुसे व अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मराठवाडा विदर्भात सोयाबीन व कापसाचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करून पेरणी करावी लागल्याने बियाणे उगवलेच नाही.याबाबत शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रारी करून ही आज तागायत नुकसान भरपाई दिली गेली नाही.कृषी खात्याचे संचालक व मुख्य गुणनियंत्रण व निविष्ठा कृषी आयुक्त कार्यालयामार्फत बोगस खत बियाणे औषधी पुरवणाऱ्या कंपन्यांना परवाने कोणी दिले याची चौकशी करावी व प्रयोगशाळेतील प्रमाणित अप्रमानीत अहवाल देणे बंधनकारक परवान्याच्या बाबतीत नियमावची तरतूद कायद्यात असतानाही बोगस कंपनीला परवाने कोणी दिले याची चौकशी मुद्दे निहाय करण्यासाठी अनेकवेळा मागणी करुनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही कंपन्यांना आजतागायत काळया यादीत टाकले नाही यामुळे शेतकर्यांची लुट सुरुच असुन कंपन्यांच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी त्रिमूर्ती सरकारने बनावट बि बियाणे खते औषधी  संदर्भात नवीन कायदा तयार करताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देण्याची तरतूद कायद्यामध्ये करून खास बाब म्हणून केंद्र शासनाकडे प्रस्ताव  पाठवा अशी मागणी वसंत मुंडे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....