इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 सदोष व निकृष्ट बियाणांमध्ये नुकसान शेतकऱ्यास झाल्यास भरपाई देण्याची तरतूद करा- वसंत मुंडे



 परळी (प्रतिनिधी)

  महाराष्ट्र मध्ये २०१९ पासून आजतागायत अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना बोगस निकृष्ट बी बियाणे,खत,औषधी पुरवून करोडो रुपयांना लुटले.नुकसान झालेल्या शेतकर्यांना कायद्यात भरपाईची तरतुद करावी अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.

 माजी कृषिमंत्री दादा भुसे व अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मराठवाडा विदर्भात सोयाबीन व कापसाचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करून पेरणी करावी लागल्याने बियाणे उगवलेच नाही.याबाबत शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रारी करून ही आज तागायत नुकसान भरपाई दिली गेली नाही.कृषी खात्याचे संचालक व मुख्य गुणनियंत्रण व निविष्ठा कृषी आयुक्त कार्यालयामार्फत बोगस खत बियाणे औषधी पुरवणाऱ्या कंपन्यांना परवाने कोणी दिले याची चौकशी करावी व प्रयोगशाळेतील प्रमाणित अप्रमानीत अहवाल देणे बंधनकारक परवान्याच्या बाबतीत नियमावची तरतूद कायद्यात असतानाही बोगस कंपनीला परवाने कोणी दिले याची चौकशी मुद्दे निहाय करण्यासाठी अनेकवेळा मागणी करुनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही कंपन्यांना आजतागायत काळया यादीत टाकले नाही यामुळे शेतकर्यांची लुट सुरुच असुन कंपन्यांच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी त्रिमूर्ती सरकारने बनावट बि बियाणे खते औषधी  संदर्भात नवीन कायदा तयार करताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देण्याची तरतूद कायद्यामध्ये करून खास बाब म्हणून केंद्र शासनाकडे प्रस्ताव  पाठवा अशी मागणी वसंत मुंडे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!