युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 अंबा कारखान्याच्या चेअरमनपदी दुसर्‍यांदा रमेशराव आडसकर; दत्तात्रय पाटील यांना  व्हाईस चेअरमन पद 

अंबाजोगाई - मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असणारा अंबाजोगाई सहकार साखर कारखाना बिनविरोध काढून एक आदर्श निर्माण केला होता. आज चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीमध्ये चेअरमनपदी रमेश आडसकर यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. तर  दत्तात्रय पाटील यांना व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली  आहे. 

मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असलेला अंबाकारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली होती. या निवडणूकीवर होणारा अनाठाई खर्च वाचविण्यासाठी विरोधकांना सोबत घेत ही निवडणूक बिनविरोध काढली. शनिवार चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या निवडीसाठी कारखाना परिसरात आयोजित केलेल्या बैठकीत चेअरमनदपदी रमेश आडसकर तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. परळीच्या वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणूकीत मुंडे-बहिण भावाने एकत्र येवून कारखाना बिनविरोध काढला. याचाच धागा धरत आडसकरांनी देखील अंबाकारखाना बिनविरोध काढण्यासाठी विरोधकांना सोबत घेत हा कारखाना बिनविरोध काढला. कारखन्याच्या संचालक मंडळात केज, धारूर, अंबाजोगाई, परळी, रेणापुर या तिन्ही तालुक्यातील नवख्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कारखान्याचे कार्य क्षेत्र बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यासाठी सहकार क्षेत्रात अंबाकारखाना महत्वाचा मानला जातो. अंबा कारखाना ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार यांच्यासाठी नेहमीच संजीवणी ठरलेला आहे. कारखाना सुरू झाला की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कार्यक्षेत्रातील इतर साखर कारखान्याप्रमाणे भाव देण्याचे काम अंबासाखरने केलेल आहे. आडसकरांनी अंबाकारखाना कर्ज मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. हा कारखाना राजकारणाची दिशा ठरविण्यात गणला जातो. ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचे हित लक्षात घेवून निवडणूकीवर होणारा खर्च टाळून बिनविरोधी काढला. यामध्ये सर्व नविन चेहर्‍यांना संधी उपलब्ध करून दिली. सोबतच आडसकरा यांच्या राजकारणातील एकेकाळचे कट्टर विरोधक राहिलेले दत्तात्रय पाटील यांच्याशी जुळवून घेत मैत्रीचा हात पुढे केला. आणि त्यांना व्हाईस चेअरमची संधी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या