परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 अंबा कारखान्याच्या चेअरमनपदी दुसर्‍यांदा रमेशराव आडसकर; दत्तात्रय पाटील यांना  व्हाईस चेअरमन पद 

अंबाजोगाई - मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असणारा अंबाजोगाई सहकार साखर कारखाना बिनविरोध काढून एक आदर्श निर्माण केला होता. आज चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीमध्ये चेअरमनपदी रमेश आडसकर यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. तर  दत्तात्रय पाटील यांना व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली  आहे. 

मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असलेला अंबाकारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली होती. या निवडणूकीवर होणारा अनाठाई खर्च वाचविण्यासाठी विरोधकांना सोबत घेत ही निवडणूक बिनविरोध काढली. शनिवार चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या निवडीसाठी कारखाना परिसरात आयोजित केलेल्या बैठकीत चेअरमनदपदी रमेश आडसकर तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. परळीच्या वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणूकीत मुंडे-बहिण भावाने एकत्र येवून कारखाना बिनविरोध काढला. याचाच धागा धरत आडसकरांनी देखील अंबाकारखाना बिनविरोध काढण्यासाठी विरोधकांना सोबत घेत हा कारखाना बिनविरोध काढला. कारखन्याच्या संचालक मंडळात केज, धारूर, अंबाजोगाई, परळी, रेणापुर या तिन्ही तालुक्यातील नवख्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कारखान्याचे कार्य क्षेत्र बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यासाठी सहकार क्षेत्रात अंबाकारखाना महत्वाचा मानला जातो. अंबा कारखाना ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार यांच्यासाठी नेहमीच संजीवणी ठरलेला आहे. कारखाना सुरू झाला की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कार्यक्षेत्रातील इतर साखर कारखान्याप्रमाणे भाव देण्याचे काम अंबासाखरने केलेल आहे. आडसकरांनी अंबाकारखाना कर्ज मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. हा कारखाना राजकारणाची दिशा ठरविण्यात गणला जातो. ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचे हित लक्षात घेवून निवडणूकीवर होणारा खर्च टाळून बिनविरोधी काढला. यामध्ये सर्व नविन चेहर्‍यांना संधी उपलब्ध करून दिली. सोबतच आडसकरा यांच्या राजकारणातील एकेकाळचे कट्टर विरोधक राहिलेले दत्तात्रय पाटील यांच्याशी जुळवून घेत मैत्रीचा हात पुढे केला. आणि त्यांना व्हाईस चेअरमची संधी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!