वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा 65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले अश्वासन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....तालुक्यातील वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा वारसाहक्काने जमीनी नावावर करण्याचा  65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू असे अश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

       वसंतनगर तांडा येथील गट क्र 478/466/ 468/469 मधील जमीनी वारसाच्या नावे होणे बाबत निवेदन देण्यात आले असुन जिल्हाधिकारी पत्र क्र-93/आर बी/ एल एन डी/1-59 जिल्हाधिकार्यालय बीड दि.13-11-2003 च्या पत्रा आधारे या जमीनीवर वारसांची नावे लावावीत अशी मागणी आहे. सर्व 48 सभासद वसंत नगर तांडा तालुका परळी जिल्हा बीड येथील रहिवासी असून प्रत्येक कुटुंबास दहा (10) एकर याप्रमाणे 48 कुटुंबांना जमीन मिळालेली आहे त्या जमिनीच्या आदेश क्र.93 वाटप सन 1961-62 या वर्षात मिळाली असून आज रोजी 48 सभासदांपैकी 90 टक्के सभासद मयत असून सदरील जमीन ही कायद्याने आम्ही वारस आहोत तरी सदरील जमिनी ही वारसा लावून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले.यावर तात्काळ तहसीलदार यांना सूचना देत हा प्रश्न लवकर मार्गी लावावे असे निर्देश दिले.यावेळी सरपंच विजय राठोड, उपसरपंच कुंडलिक जाधव, संजय राठोड, भगवान जाधव, रमेश राठोड, राजू राठोड, बालू राठोड, अजय राठोड, अर्जुन राठोड, करण राठोड, पवन राठोड, ज्ञानोबा चव्हाण, रावसाहेब चव्हाण आदी उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार