परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संत विचारानेच टिकेल राष्ट्रीय एकात्मता -बापूसाहेब देहूकर यांनी व्यक्‍त केला आशावाद!



पंढरपूर (प्रतिनिधी) : वारकरी संतांनी कायम सामाजिक ऐक्याची भूमिका मांडली. सर्व जाती-धर्मांतील संत वारकरी परंपरेत पहायला मिळतात. म्हणूनच या देशातील एकात्मता ही संत विचारानेच भक्कम होईल, असा आशावाद तुकाराम महाराज यांचे वंशज, देहूकर फडाचे प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर यांनी व्यक्‍त केला. तर संताचे विचार आणि त्यातील एकात्मतेचं मूल्य टिकवून ठेवण्याचे काम दिंडीकरी-फडकरी परंपरेने केले आहे, असे मत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे संचालक, दिंडीकरी, फडकरी संघटनेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी व्यक्‍त केले.

संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय प्रतिकांचा स्वाभिमान जागविण्यासाठी संविधान समता दिंडी आयोजित राष्ट्रचेतना अभियानाचा प्रारंभ पंढरपूर येथील 'तुकाराम भवन' सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा, राष्ट्रगीत जन-गण-मन, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट या राष्ट्रीय प्रतिकांबद्दल समाजातील आदराची भावना भक्कम व्हावी यासाठी संविधान समता दिंडीच्या वतीने राष्ट्रचेतना अभियान सुरू करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या अभियानाचा प्रारंभ पंढरपूर येथून झाला. या अभियानाचे उद्घाटक म्हणून बापूसाहेब महाराज देहूकर, तर अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर महाराज जळगावकर उपस्थित होते. या सोहळ्याचे संयोजक ह.भ.प. भारत महाराज घोगरे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले. तर ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी प्रास्ताविक करताना या अभियानाचा उद्देश अधोरेखित केला. यावेळी त्यांनी संविधान निर्मिती, राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा, राष्ट्रगीत जन-गण-मन याचा संपूर्ण इतिहास सांगितला.

प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ज्ञ दादासाहेब रोंगे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाची आज किती गरज आहे, हे समजून सांगितले. मोहन अनपट यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैकाडी महाराज यांचे वंशज मठाधिपती भारत महाराज जाधव, देवराम महाराज कोठारे, एड. कल्याण काळे, दादा महाराज पनवेकर, गणेश महाराज फरताळे यांनी मोलाचे सहकार्य केले. 15 ऑगस्ट रोजी या अभियानाचा समारोपात मुंबई येथे होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!