दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

कर्तव्यनिष्ठता हेच उज्वल कार्याचे प्रतीक - डॉ. माधव रोडे

 कर्तव्यनिष्ठता हेच उज्वल कार्याचे प्रतीक - डॉ. माधव रोडे



परळी प्रतिनिधी- वैद्यनाथ कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर श्री. बी.डी. केदारे हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने आज विभागाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख, डॉ माधव रोडे होते, तर प्रमुख म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी.व्हि.केंद्रे होते. सत्कारमूर्ती श्री केदारे यांचा सत्कार डॉ. माधव रोडे,रोडे, डॉ केंद्रे, डॉ गीते आणि डॉ. विनोद  गायकवाड यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ केंद्रे यांनी श्री केदारे यांचा कार्यपरिचय देऊन गौरव उद्गार काढले. कार्यक्रमात डॉ.गीते, डॉ . विनोद गायकवाड,  प्रा वडाळ यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

अध्यक्ष समारोपात डॉ. माधव रोडे म्हणाले की,  श्री केदारे म्हणजे अल्प व मृदुभाषी,  संयमी, कार्यत्पर व्यक्ती असल्याने ते जीवनात समाधानी आहेत आणि समाधानी व्यक्तीच कर्तव्यनिष्ठ- उज्वल कार्याचे प्रतीक असतो असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ.एम.जी. लांडगे यांनी मानले. या निरोप समारंभासाठी डॉ. मुंडे, डॉ सातपुते,  डॉ कलमे,  प्रा.गोरे, प्रा. कांदे, प्रा. रेणुकदास, श्री. चौकले, अनिल जगतकर, नाथराव मुंडे व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....