इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळा

 श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात

बीड दि०९ (प्रतिनिधी)

                श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन ३ जुलै गुरुपौर्णिमा ते सोमवार (ता.०७) आँगस्ट पर्यंत करण्यात आले होते या सोहळ्यास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

             स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ४९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५० वे वर्षे होते. ३ जुलै गुरुपौर्णिमेला श्री.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते कलशपुजन करुन चातुर्मास सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सप्ताहात पहाटे शिवपाठ, मन्मस्वामी यांची महापूजा, रुद्रपठण, गाथा भजन, प्रवचन, किर्तन, शिवजागर, महाप्रसाद आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान ३५ दिवस विविध मान्यवर महाराजांच्या किर्तनांचे त्याचबरोबर रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (ता.०६) सकाळी निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांचे कीर्तन दुपारी राजलिंग शिवाचार्य महाराज बार्शी यांचे टाळ आरती किर्तन संपन्न झाले. संध्याकाळी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.मन्मथस्वामी मंदिर दिपोत्सवामुळे उजळून निघाले. दरम्यान या सर्व कार्यक्रमास महाराष्ट्रातील वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. चातुर्मास सप्ताहाचे हे ५० वे सुवर्णमहोत्सवी वर्षे असल्याने सप्ताहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काशीपीठाचे जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनीही या सोहळ्यास उपस्थिती लावली. भक्तांसाठी आर्शिवचन दिले. शेवटच्या दिवशी प्रासादिक किर्तन दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचे संपन्न झाले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पंचकमेटी सदस्य सोमनाथअप्पा  हालगे, शिवाअण्णा भुरे आदी उपस्थित होते. यामध्ये ज्ञानयज्ञ सोहळ्यास आजपर्यंत सहकार्य करत असलेले अन्नदाते, किर्तनकार, प्रवचनकार व मान्यवरांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार आयोजकाच्या वतीने करण्यात आला. यावर्षी आदिकमास असल्याने भाविक भक्त़ाची सप्ताहात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या