इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

 परळी तालुका अवर्षणग्रस्त: शेतकऱ्यांना २५ % विमा अग्रिम मिळणारच!


कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

परळी वैजनाथ , प्रतिनिधी
          गेल्या महिनाभरापासून परळी तालुक्यात पाऊस आलेलाच नसल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळजवळ खरीप हंगाम हा उध्वस्त झाल्यात जमा आहे. त्यामुळे विम्याच्या निकषानुसार 25% विमा आग्रीम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बंधनकारकच आहे. त्याबरोबरच कृषी विभागाच्या क्षेत्रीय पाहणीचा अहवाल हीच परिस्थिती दाखवतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या बदल्यात 25 टक्के विमा अग्रीम मिळणारच हे आता निश्चित आहे.
          परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने  अवर्षणग्रस्त तालुका म्हणून प्रशासनानेही नोंद घेतलेली आहे.शासनास अहवाल पाठवून व पीक विम्याची अग्रीम मंजुर करण्याबाबत शिफारस कृषी कार्यालयाने पाठवलेल्या आहवालात करण्यात आलेली आहे. कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान  झाल्याचा कृषी विभागाचा आहवाल आहे. परळी तालुक्यातील मंडळनिहाय क्षेत्र पाहणीचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवला असून या अहवालात मंडळी पाहणी व नुकसानीचा आढावा सादर करण्यात आलेला आहे. परळी तालुक्यातील परळी वैजनाथ, धर्मापुरी, नागपूर, मोहा ,सिरसाळा व पिंपळगाव गाढे या सहा मंडळातील नुकसानीची पाहणी व पीक परिस्थिती याचा अहवाल प्रशासनाने तयार केला असून हा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालात मंडळनिहाय  नुकसानीची टक्केवारी व पिकनिहाय नुकसान दाखवण्यात आले असून जवळपास सर्वच मंडळांमध्ये कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान  झाल्याचा कृषी विभागाचा आहवाल आहे. त्याचप्रमाणे हा अहवाल सादर करताना क्षेत्रीय पाहणी चा निष्कर्ष म्हणून तालुका कृषी कार्यालयाने हे नुकसान पाहता व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता विम्याचे 25% अग्रीम देण्याची शिफारस केलेली आहे.


      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या