दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

 परळी तालुका अवर्षणग्रस्त: शेतकऱ्यांना २५ % विमा अग्रिम मिळणारच!


कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

परळी वैजनाथ , प्रतिनिधी
          गेल्या महिनाभरापासून परळी तालुक्यात पाऊस आलेलाच नसल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळजवळ खरीप हंगाम हा उध्वस्त झाल्यात जमा आहे. त्यामुळे विम्याच्या निकषानुसार 25% विमा आग्रीम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बंधनकारकच आहे. त्याबरोबरच कृषी विभागाच्या क्षेत्रीय पाहणीचा अहवाल हीच परिस्थिती दाखवतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या बदल्यात 25 टक्के विमा अग्रीम मिळणारच हे आता निश्चित आहे.
          परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने  अवर्षणग्रस्त तालुका म्हणून प्रशासनानेही नोंद घेतलेली आहे.शासनास अहवाल पाठवून व पीक विम्याची अग्रीम मंजुर करण्याबाबत शिफारस कृषी कार्यालयाने पाठवलेल्या आहवालात करण्यात आलेली आहे. कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान  झाल्याचा कृषी विभागाचा आहवाल आहे. परळी तालुक्यातील मंडळनिहाय क्षेत्र पाहणीचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवला असून या अहवालात मंडळी पाहणी व नुकसानीचा आढावा सादर करण्यात आलेला आहे. परळी तालुक्यातील परळी वैजनाथ, धर्मापुरी, नागपूर, मोहा ,सिरसाळा व पिंपळगाव गाढे या सहा मंडळातील नुकसानीची पाहणी व पीक परिस्थिती याचा अहवाल प्रशासनाने तयार केला असून हा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालात मंडळनिहाय  नुकसानीची टक्केवारी व पिकनिहाय नुकसान दाखवण्यात आले असून जवळपास सर्वच मंडळांमध्ये कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान  झाल्याचा कृषी विभागाचा आहवाल आहे. त्याचप्रमाणे हा अहवाल सादर करताना क्षेत्रीय पाहणी चा निष्कर्ष म्हणून तालुका कृषी कार्यालयाने हे नुकसान पाहता व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता विम्याचे 25% अग्रीम देण्याची शिफारस केलेली आहे.


      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....