परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

खरिपाची पीकं पूर्णपणे हातातून गेली ; शेतकऱ्यांवर मोठं संकट

 बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्या - पंकजा मुंडे यांची मागणी


सलग २५ दिवस पाऊस नाही ; परळी तालुक्यात सर्वात कमी  पाऊस तर जिल्हयात केवळ ४२ टक्केच पाऊस



खरिपाची पीकं पूर्णपणे हातातून गेली ; शेतकऱ्यांवर मोठं संकट


बीड । दिनांक १९ ।

जिल्हयात सलग २५ दिवस पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाची पीकं पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आलं आहे. अशा संकटात त्यांना आधार देणं खूप आवश्यक आहे. विमा कंपनीने जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


    यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच जिल्हयात अत्यल्प पाऊस झाला. पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या आणि नंतर पावसाने सलग २५ दिवस उघडीप दिली.२४ जूलै ते १८ ऑगस्ट दरम्यान जिल्हयात कुठेच पाऊस पडला नाही परिणामी खरीप पीकांची वाढ खुंटली. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हयात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला, सर्वात कमी २९ टक्के पाऊस परळी तालुक्यात नोंदला गेला. जिल्हयात  उस वगळता ७ लाख ६६ हजार ६८० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या, पण पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पीकं हातची गेली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

विम्याची अग्रीम रक्कम द्या

-------------

पीक विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या भागात पावसाचा सलग २१ दिवस खंड असेल तर पीक विम्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ॲडव्हान्स (अग्रीम) रक्कम देण्याची तरतूद आहे, पाऊस नसल्याने पीकं हातची गेली आहेत, त्यामुळे शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे, त्यांना आधार देण्याची आज खरी गरज आहे. विमा  कंपनीने आता कशाचीही वाट न पाहता शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा आणि तात्काळ अग्रीम रक्कम वाटप करावी तसेच कृषी खात्याने विमा कंपनीला तसे आदेशित करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!