दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

खरिपाची पीकं पूर्णपणे हातातून गेली ; शेतकऱ्यांवर मोठं संकट

 बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्या - पंकजा मुंडे यांची मागणी


सलग २५ दिवस पाऊस नाही ; परळी तालुक्यात सर्वात कमी  पाऊस तर जिल्हयात केवळ ४२ टक्केच पाऊस



खरिपाची पीकं पूर्णपणे हातातून गेली ; शेतकऱ्यांवर मोठं संकट


बीड । दिनांक १९ ।

जिल्हयात सलग २५ दिवस पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाची पीकं पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आलं आहे. अशा संकटात त्यांना आधार देणं खूप आवश्यक आहे. विमा कंपनीने जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


    यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच जिल्हयात अत्यल्प पाऊस झाला. पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या आणि नंतर पावसाने सलग २५ दिवस उघडीप दिली.२४ जूलै ते १८ ऑगस्ट दरम्यान जिल्हयात कुठेच पाऊस पडला नाही परिणामी खरीप पीकांची वाढ खुंटली. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हयात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला, सर्वात कमी २९ टक्के पाऊस परळी तालुक्यात नोंदला गेला. जिल्हयात  उस वगळता ७ लाख ६६ हजार ६८० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या, पण पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पीकं हातची गेली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

विम्याची अग्रीम रक्कम द्या

-------------

पीक विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या भागात पावसाचा सलग २१ दिवस खंड असेल तर पीक विम्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ॲडव्हान्स (अग्रीम) रक्कम देण्याची तरतूद आहे, पाऊस नसल्याने पीकं हातची गेली आहेत, त्यामुळे शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे, त्यांना आधार देण्याची आज खरी गरज आहे. विमा  कंपनीने आता कशाचीही वाट न पाहता शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा आणि तात्काळ अग्रीम रक्कम वाटप करावी तसेच कृषी खात्याने विमा कंपनीला तसे आदेशित करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....