इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन

 ■ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार- धनंजय मुंडे

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन 


परळी वैजनाथ प्रतिनिधी

        महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार असल्याचे अश्वासन राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने याबाबत आज ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.


             परळी औष्णिक विद्युत केंद्र,सिमेंट फॅक्टरी तसेच परिसरातील हजारो वीटभट्टी उद्योग वाढती वाहनांची संख्या यामुळे परळी शहर आणि परिसरात वायू प्रदूषण झपाट्याने वाढत असून डब्ल्यु एच ओ च्या वार्षिक गुणवत्ता मार्गदर्शक तत्वानुसार वायु गुणवत्ता निर्देशांक   हा ६ पट खराब आहे. ही गंभीर बाब निर्माण झालेली आहे. संभाजीनगर नंतर परळी वैजनाथ प्रदूषणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे शहर आहे.पर्यावरणातील वाढते कार्बन मोनाक्साईड गंधक,यामुळे श्वसनाचे रोग,दमा,क्रॉनिक ऑबस्ट्रॅक्टीव्ह पल्मोनरी डिसिज (COPD) फुफ्फुसांची श्वसन क्षमता कमी होणे,कर्करोग त्वचेचा निस्तेजपणा वाढणे,हेअर फॉल या नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत चालल्या आहेत.वातावरणातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सक्षम प्राधिकरण असणे गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये सुरु झाले तर प्रतिबंधात्मक आवश्यक त्या उपाययोजना तसेच विविध अभियान राबविणे शक्य होवून प्रदूषणाला रोखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहता येईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे  यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.

         याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतिने शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आज मुंबई येथे राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्यासोबत या विषयाव चर्चा करून निवेदन दिले. या विषयावर तात्काळ  धनंजय मुंडे यांनी सबंधित आयुक्तांना फोन करून या संबंधी सूचना दिल्या. लवकरच पर्यावरण मंत्री यांच्यासह बैठक आयोजित करुन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!