दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन

 ■ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार- धनंजय मुंडे

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन 


परळी वैजनाथ प्रतिनिधी

        महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार असल्याचे अश्वासन राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने याबाबत आज ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.


             परळी औष्णिक विद्युत केंद्र,सिमेंट फॅक्टरी तसेच परिसरातील हजारो वीटभट्टी उद्योग वाढती वाहनांची संख्या यामुळे परळी शहर आणि परिसरात वायू प्रदूषण झपाट्याने वाढत असून डब्ल्यु एच ओ च्या वार्षिक गुणवत्ता मार्गदर्शक तत्वानुसार वायु गुणवत्ता निर्देशांक   हा ६ पट खराब आहे. ही गंभीर बाब निर्माण झालेली आहे. संभाजीनगर नंतर परळी वैजनाथ प्रदूषणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे शहर आहे.पर्यावरणातील वाढते कार्बन मोनाक्साईड गंधक,यामुळे श्वसनाचे रोग,दमा,क्रॉनिक ऑबस्ट्रॅक्टीव्ह पल्मोनरी डिसिज (COPD) फुफ्फुसांची श्वसन क्षमता कमी होणे,कर्करोग त्वचेचा निस्तेजपणा वाढणे,हेअर फॉल या नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत चालल्या आहेत.वातावरणातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सक्षम प्राधिकरण असणे गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये सुरु झाले तर प्रतिबंधात्मक आवश्यक त्या उपाययोजना तसेच विविध अभियान राबविणे शक्य होवून प्रदूषणाला रोखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहता येईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे  यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.

         याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतिने शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आज मुंबई येथे राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्यासोबत या विषयाव चर्चा करून निवेदन दिले. या विषयावर तात्काळ  धनंजय मुंडे यांनी सबंधित आयुक्तांना फोन करून या संबंधी सूचना दिल्या. लवकरच पर्यावरण मंत्री यांच्यासह बैठक आयोजित करुन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....