परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 आर्ट ऑफ लिव्हिंगचे 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नवगण महाविद्यालयात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपाशीर्वादाने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान श्री. रत्नेश्वर शेटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात संपन्न झाले. तब्बल ४२ जणांनी या कोर्सचा लाभ घेतला.


प्रत्येकाने खूप आनंदाच्या क्षणी तसेच एखाद्या कामात पूर्ण बुडून गेलेले असताना असा अनुभव घेतला असेल की ध्यानाचा एक क्षण असा येतो जेंव्हा मन खूप हलके आणि तरल होते. आपण जरी असे क्षण अनुभवले असेल तरी आपण आपल्या इच्छेने तो पुन्हा पुन्हा अनुभवू शकत नाही. सहज समाधी ध्यान आपल्याला तो अनुभव पुन्हा पुन्हा कसा मिळवावा हे शिकवतो. सहज समाधी ध्यान मध्ये सहभागी होणाऱ्याला तणावापासून तत्काळ मुक्ती मिळते, मन खोलवर मोकळे होते आणि सर्व शरीराला पुनर्नवे करते.


'सहज' एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नैसर्गिक किंवा सुलभ असा आहे. 'समाधी' ही एक खूप खोलवर अशी प्रसन्न ध्यानाची स्थिती आहे. 'सहज समाधी ध्यान 'म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय.


हे ध्यान सतत केल्याने शांती, ऊर्जा आणि दिवसभर टिकणारी सजगता निर्माण होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते. योगाबरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो. जागृत / सचेतन  मन आत्म्यात विलीन होते व गहन विश्रांतीचा अनुभव येतो. जेव्हा मन शांत होते तेव्हा सर्व तणाव निघून जातात आणि मग एकाग्रता वाढून तुम्ही आरोग्यपूर्ण होता.


यासर्व गोष्टींची अनुभूती उपस्थित साधकांनी घेतली. तीन दिवस सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान दोन बॅचमध्ये 'सहज समाधी ध्यान' कोर्स संपन्न झाला. कोर्स नंतर काही सहभागी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यासाठी परळी वैजनाथ येथील आय.सि. शिरीष चौधरी व अंबाजोगाई येथील आय.सि. पांडे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी परिश्रम घेतले.


सहज समाधी ध्यानाने नवीन ऊर्जा संचारली : ईटके गुरुजी

सन २००३ पासून नित्यनेमाने मी सुदर्शन क्रिया करतो. मात्र गेल्या तीन दिवसांत मला कमालीची शांतता लाभली आहे. रत्नेश्वर शेटे यांनी केलेले मार्गदर्शन अमूल्य आहे. यापुढे मी दररोज सहज समाधी ध्यान नक्की करेन असे मनोगत यावेळी जेष्ठ नागरिक ईटके गुरुजी यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!