दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

 आर्ट ऑफ लिव्हिंगचे 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नवगण महाविद्यालयात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपाशीर्वादाने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान श्री. रत्नेश्वर शेटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात संपन्न झाले. तब्बल ४२ जणांनी या कोर्सचा लाभ घेतला.


प्रत्येकाने खूप आनंदाच्या क्षणी तसेच एखाद्या कामात पूर्ण बुडून गेलेले असताना असा अनुभव घेतला असेल की ध्यानाचा एक क्षण असा येतो जेंव्हा मन खूप हलके आणि तरल होते. आपण जरी असे क्षण अनुभवले असेल तरी आपण आपल्या इच्छेने तो पुन्हा पुन्हा अनुभवू शकत नाही. सहज समाधी ध्यान आपल्याला तो अनुभव पुन्हा पुन्हा कसा मिळवावा हे शिकवतो. सहज समाधी ध्यान मध्ये सहभागी होणाऱ्याला तणावापासून तत्काळ मुक्ती मिळते, मन खोलवर मोकळे होते आणि सर्व शरीराला पुनर्नवे करते.


'सहज' एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नैसर्गिक किंवा सुलभ असा आहे. 'समाधी' ही एक खूप खोलवर अशी प्रसन्न ध्यानाची स्थिती आहे. 'सहज समाधी ध्यान 'म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय.


हे ध्यान सतत केल्याने शांती, ऊर्जा आणि दिवसभर टिकणारी सजगता निर्माण होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते. योगाबरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो. जागृत / सचेतन  मन आत्म्यात विलीन होते व गहन विश्रांतीचा अनुभव येतो. जेव्हा मन शांत होते तेव्हा सर्व तणाव निघून जातात आणि मग एकाग्रता वाढून तुम्ही आरोग्यपूर्ण होता.


यासर्व गोष्टींची अनुभूती उपस्थित साधकांनी घेतली. तीन दिवस सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान दोन बॅचमध्ये 'सहज समाधी ध्यान' कोर्स संपन्न झाला. कोर्स नंतर काही सहभागी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यासाठी परळी वैजनाथ येथील आय.सि. शिरीष चौधरी व अंबाजोगाई येथील आय.सि. पांडे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी परिश्रम घेतले.


सहज समाधी ध्यानाने नवीन ऊर्जा संचारली : ईटके गुरुजी

सन २००३ पासून नित्यनेमाने मी सुदर्शन क्रिया करतो. मात्र गेल्या तीन दिवसांत मला कमालीची शांतता लाभली आहे. रत्नेश्वर शेटे यांनी केलेले मार्गदर्शन अमूल्य आहे. यापुढे मी दररोज सहज समाधी ध्यान नक्की करेन असे मनोगत यावेळी जेष्ठ नागरिक ईटके गुरुजी यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....