इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 मणिपुर मधील जातीय हिंसा व महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थी व युवक युवतींची तीव्र निदर्शने

एसएफआय, डीवायएफआय विद्यार्थी युवक संघटनेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने


परळी / प्रतिनिधी


मणिपुर मधील जाती हिंसा थांबवून केंद्र सरकारने तेथील राज्य सरकार बरखास्त करावे, कुकी आदीवासी महिलांची नग्न धिंड काढणार्‍या जमावावर त्यांना शोध घेऊन  गुन्हे दाखल करावेत. या गुन्हेगारांना फासावर लटकवा या प्रमुख मागणीसाठी परळी येथे बुधवार, दि.02 ऑगस्ट रोजी एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज परळी येथे  जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करून निवेदन देण्यात आले.


एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी,युवक,युवती संघटनेच्या वतीने बुधवार रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, केंद्र सरकारने कुकी आदिवासींचे आरक्षण गैर आदिवासी मैतई जातीस देणे बाबत आश्वासन देऊन दोन भिन्न जात जमातीत आग लावली, संपुर्ण देशात लोकांचे जिवन जगण्याचे प्रश्न सोडून हिंदु, मुसलमान, हिंदु, खिश्चन आणि हिंदु, मधल्या मागास जाती यांच्यात जातीय, धार्मिक आणि समाजिक विष पेरून एक प्रकारचा सांप्रादायीक उन्माद निर्माण केला आहे. परिणामी देश जात आणि धर्माच्या विद्वेषात जळत आहे. परिणामी, आदिवासींचे 300 प्रार्थना स्थळे जाळली गेली, 50 हजार घरे जाळून खाक केली.


असंख्य माणसे कॅम्पमध्ये आश्रयास आहेत, राज्य सरकारने या हिंसेला आणि अराजकास फूस लावून माणसापासून माणूस परका केला. मे महिन्यात मैतेई समूहाने तीन महिलांचे अपहरण करून बलात्कार तर केलाच पण त्या आधी त्याची विवस्त्र धिंड काढली. देशात आणि राज्यात लोकशाही आणि सांवैधनिक संस्थांची मोडतोड करून भारतीय संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निदर्शनानिमित्त आम्ही मणिपूर राज्य बरखास्त करून तेथील दंगाई व गुन्हेगारांना फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली . निवेदन देण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.


यावेळी  कॉ.ऍड.परमेश्वर गीते,कॉ.प्रकाश चव्हाण, कॉ.प्रवीण देशमुख, नंदू देशमुख, कॉ.जालिंदर गिरी, ज्ञानेश्वर सोळंके,अमर सोळंके,गोविंद सोळंके, केशव मुंडे, डी.वाय.एफ.आय जिल्हा सचिव कॉ.विशाल देशमुख, मनोज स्वामी,बाळासाहेब शेप SFI जिल्हाउपाध्यक्ष अंकुश कोकाटे, हनुमंत शिंदे डी वाय एफ आय परळी तालुका अध्यक्ष कॉ.मनोज देशमुख, तालुका सचिव कॉ.विजय घुगे, तालुका उपाध्यक्ष कॉ.मुंजा नवघरे कॉ. सिद्राम सोळंके यांच्यासह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी,युवक,युवती चळवळीतील कार्यकर्ते व मानवतेवर प्रेम करणारे नागरिक सहभागी झाले होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या