दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

परचुंडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी-भीमाशंकर नावंदे


 परचुंडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे  वाटप


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

जातीय वर्ण भेदाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवस शाळा शिकणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.त्यांच्या लेखनातून शोषितांच्या संघर्षमय जीवनाला ऊर्जा मिळते. अन्यायविरोधी लढण्याची प्रेरणा मिळते. जगविख्यात थोर साहित्यिकाची आज १०३ वी जयंती आहे. त्यांनी मांडलेल्या प्रखर साहित्यातून अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा कायम मिळते, असे विचार प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरआप्पा नावंदे यांनी व्यक्त केले.


आज मंगळवार दिनांक 29.08.2023 रोजी परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री नावंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी  प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरआप्पा नावंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कमिटीच्या वतीने जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमास उपसरपंच बाळासाहेब थोरात, मा.उपसरपंच वैजनाथ पत्रवाळे, गावचे ज्येष्ठ नागरिक सुभाष दादा रुपनर, माऊली गडदे सर ,देवराव पत्रवाळे, नानासाहेब रुपनर , रामा सरांडे, व्यंकट गडदे पाटील, कमलाकर नावंदे , प्रेस फोटोग्राफर गणेश पत्रवाळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, पालक व गावातील सर्व महिला, पुरुष, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....