प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

परचुंडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी-भीमाशंकर नावंदे


 परचुंडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे  वाटप


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

जातीय वर्ण भेदाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवस शाळा शिकणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.त्यांच्या लेखनातून शोषितांच्या संघर्षमय जीवनाला ऊर्जा मिळते. अन्यायविरोधी लढण्याची प्रेरणा मिळते. जगविख्यात थोर साहित्यिकाची आज १०३ वी जयंती आहे. त्यांनी मांडलेल्या प्रखर साहित्यातून अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा कायम मिळते, असे विचार प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरआप्पा नावंदे यांनी व्यक्त केले.


आज मंगळवार दिनांक 29.08.2023 रोजी परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री नावंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी  प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरआप्पा नावंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कमिटीच्या वतीने जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमास उपसरपंच बाळासाहेब थोरात, मा.उपसरपंच वैजनाथ पत्रवाळे, गावचे ज्येष्ठ नागरिक सुभाष दादा रुपनर, माऊली गडदे सर ,देवराव पत्रवाळे, नानासाहेब रुपनर , रामा सरांडे, व्यंकट गडदे पाटील, कमलाकर नावंदे , प्रेस फोटोग्राफर गणेश पत्रवाळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, पालक व गावातील सर्व महिला, पुरुष, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट