दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

विशेष भेट :महत्त्वपूर्ण प्रश्न :सकारात्मक प्रतिसाद

 खा.डॉ. प्रितम मुंडेंनी नितीन गडकरींची भेट घेत मांडले बीड जिल्हयातील विविध रस्तेविषयक प्रश्न 



परळी वैजनाथ: बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकर यांची खा.डॉ. प्रितम मुंडेंनी  त्यांच्या दिल्लीस्थित कार्यालयात भेट घेतली. यावेळी बीड जिल्हयातील विविध रस्तेविषयक प्रश्न मांडले



लातूर जिल्ह्याच्या हद्दीपासून आपल्या जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव दरम्यानचा महामार्ग चौपदरी करण्यात यावा, याकरिताचा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समाविष्ट करून चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात यावी ही मागणी यावेळी सादर केली.


तसेच तेलगाव-सिरसाळा ( राष्ट्रीय महामार्ग 361 F ) या वीस कि.मी रस्त्याचे पदपथासह चौपदरीकरण करण्यात यावे व वार्षिक योजनेत सदरील रस्त्याचा समावेश करून मंजुरी द्यावी ही मागणी केली.


तसेच धारूर तालुक्यातील घाटात असलेल्या अरुंद रस्त्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. धारूर घाटात राष्ट्रीय महामार्ग ( 548 C ) अरुंद असल्यामुळे येथे अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे, याठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. धारूरच्या घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी राज्य रस्ते महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती ही केली आहे.


बीड जिल्ह्यातील लोकहिताच्या मागण्या सादर करण्यासाठी नितीन गडकरी  यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल  त्यांचे खा.डॉ. प्रितम मुंडेंनी आभार व्यक्त केले आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....