इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राचार्य ,डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन



 परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाची प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पासून या दिवसाला  ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारताला मुक्त करण्यासाठी आनेक शूरवीरांनी प्राणाची आहुती दिली व भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. तेव्हा पासून आपण हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत आहोत. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव आप्पा मुंडे, उपाध्यक्ष टी.पी .मुंडे, संस्थेचे सचिव दत्ताप्पा इटके यांच्यासह इतर संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयन कुमार आचार्य यांनी केले.तसेच रसायनशास्त्र विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे सचिव शदत्ताप्पा ईटके, प्रमुख उपस्थिती काटकर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. एम . एन. रोडे, संयोजक डॉ एम.जी.लांडगे,  डॉ. विरश्री आर्या,  गया नागोराव यांची उपस्थिती होती. सदरील भित्तिपत्रकासाठी बी एससी, बी ए,  व बी.कॉम च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी व समाज जागृतीसाठी नवीन शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एका संघाने भित्तिपत्रक तयार केले होते तर दुसऱ्या संघाने मणिपूर न्यूज या विषयावर भित्तिपत्रक तयार केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख काटकर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे स्वागत केले तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव  दत्तापा इटके यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबाबत आजचा विद्यार्थी जागरूक असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थी आणि समाज अशा प्रकारे जागरूक झाला तर भारत नक्कीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास यशस्वीपणे सामोरे जाईल यात शंका नाही असे ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त आयोजित भित्तीपत्रकासाठी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संयोजक डॉ एम.जी. लांडगे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या