अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राचार्य ,डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन



 परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाची प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पासून या दिवसाला  ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारताला मुक्त करण्यासाठी आनेक शूरवीरांनी प्राणाची आहुती दिली व भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. तेव्हा पासून आपण हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत आहोत. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव आप्पा मुंडे, उपाध्यक्ष टी.पी .मुंडे, संस्थेचे सचिव दत्ताप्पा इटके यांच्यासह इतर संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयन कुमार आचार्य यांनी केले.तसेच रसायनशास्त्र विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे सचिव शदत्ताप्पा ईटके, प्रमुख उपस्थिती काटकर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. एम . एन. रोडे, संयोजक डॉ एम.जी.लांडगे,  डॉ. विरश्री आर्या,  गया नागोराव यांची उपस्थिती होती. सदरील भित्तिपत्रकासाठी बी एससी, बी ए,  व बी.कॉम च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी व समाज जागृतीसाठी नवीन शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एका संघाने भित्तिपत्रक तयार केले होते तर दुसऱ्या संघाने मणिपूर न्यूज या विषयावर भित्तिपत्रक तयार केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख काटकर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे स्वागत केले तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव  दत्तापा इटके यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबाबत आजचा विद्यार्थी जागरूक असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थी आणि समाज अशा प्रकारे जागरूक झाला तर भारत नक्कीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास यशस्वीपणे सामोरे जाईल यात शंका नाही असे ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त आयोजित भित्तीपत्रकासाठी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संयोजक डॉ एम.जी. लांडगे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?