मौजे जवळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ

 गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते-ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के




मौजे जवळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ

परळी  (प्रतिनिधी)

भारत हा गुरू परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते. अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरूवर्य योग्य मार्ग दाखवून त्याचे कल्याण करतात असे विचार प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के यांनी व्यक्त केले.

 मौजे जवळगाव येथे गुरुवर्य दौलतराव गुरुजी खानापूरकर व समस्त जवळगाव येथील ग्रामस्थांच्या  मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास दिनांक 22 ऑगस्टपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. कथा वाचन पंडित पुरुषोत्तम तिवारी महाराज जवळगाव वृंदावन धाम हे करीत आहेत.याप्रसंगी ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के हे बोलत होते. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे पहाटे 4 ते 6 काकड आरती ,6ते 6.30 विष्णुसहस्त्रनाम, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण ,11 ते 12 गाथा भजन, 1 ते 5 श्रीमद् भागवत कथा, 5 ते 6 हरिपाठ व धुपारती ,रात्री 9 ते 11, हरिकीर्तन व रात्री 11 ते 4 हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होत असून ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख ह भ प श्री नारायण महाराज बारटक्के परळी वैजनाथ हे आहेत. दिनांक 21 ऑगस्ट रोजी ह भ प किसन महाराज पवार , दिनांक 22 ऑगस्ट रोजी ह भ प किशोर महाराज , दिनांक 23 ऑगस्ट रोजी ह भ प आकाश महाराज खारगावकर यांचे कीर्तन संपन्न झाले. 24 ऑगस्ट रोजी ह भ प विकास महाराज वायसे शास्त्री वाकीकर, 25 ऑगस्ट रोजी ह भ प मधुकर महाराज मोहगावकर, 26 ऑगस्ट रोजी ह भ प उद्धव महाराज रमजानपूरकर ,रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी ह भ प अरुण महाराज शिंनगारे बर्दापूरकर यांचे कीर्तन संपन्न होणार असून सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा वाजता ह भ प श्री विठ्ठल महाराज घाडगे शिवनखेडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तसेच सकाळी सात ते दहा वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी मिरवणूक निघणार आहे

यावेळी ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के यांनी सांगितले की, गुरू कोण असावा ? यापासून शिष्यापर्यंतची संपूर्ण व्याख्या अतिशय सहजतेने व विविध उदाहरणासह स्पष्ट केली. पुढे बोलताना ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के म्हणाले की, गुरू सेवा ही सर्वश्रेष्ठ असून ही सेवा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्यासारखी पारदर्शक असावी. संत श्री ज्ञानेश्वर माऊली व संत श्री निवृत्तीनाथ यांचे संदर्भ उदाहरण देवून ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के पुढे म्हणाले की, गुरू हा बुद्धीचा राजा असून गुरू व शिष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जीवन जगत असतांना आपणास अनेक अडचणी येत असतात. परंतू या अडचणीतूनही सदाचाराचा मार्ग दाखविण्याचे काम आपले गुरू नकळतपणे करीत असतात त्याकरीता गुरूवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असून अनेकदा गुरू शिष्याची परिक्षा घेतो तेंव्हा शिष्याने त्या प्रसंगाला तन्मयतेने तोंड दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी संत नामदेव, ज्ञानेश्वरी माउली, जनाबाई यांच्या जीवनातील प्रसंग उपस्थितांना सांगितले.

कार्यक्रमास मौजे जवळगाव येथील ग्रामस्थांसह परिसरातील भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सादर केलेल्या घटनांनी भक्त भाविक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !