इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

परळीचे आवघड महसुलायन

परळीचे आवघड महसुलायन: दोन महिन्यांत चार तहसीलदार; परळीत सातबारा दुरुस्ती रखडली : पुरवठ्याची डाटा एण्ट्री बंद


परळी वैजनाथ, प्रतिनिधी

तहसीलदार सुरेश शेजुळ यांची गेल्या दोन महिन्यांपुर्वी बदली झाल्यानंतर दोन महिन्यात चार तहसीलदार आले. यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरु असल्याने सातबारा दुरुस्तीसाठी लागणारी डिजिटल स्वाक्षरी नसल्याने तालुक्यातील 3 हजार शेतकऱ्यांच्या सातबारा दुरुस्तीचे रखडल्याने काम शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे रखडली आहेत.

परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांची दोन महिन्यापूर्वी अकलूज येथे बदली झाल्यानंतर आतापर्यंत चार तहसीलदार झाले आहेत. या पैकी कोणीच डिजिटल स्वाक्षरी बनवली नसल्याने सातबारा दुरुस्तीचे काम आहे. सुरेश शेजुळ गेल्यानंतर आईलनवाड यांनी काही दिवस कारभार पहिला व ते सेवानिवृत्त झाले.त्यांच्या नंतर १० दिवस नायब तहसीलदार अविनाश निळेकर यांनी कार्यभार घेतला व ते ही बदलीवर माजलगावला गेले.

त्यानंतर संदीप पाटील यांनी पदभार घेतला ते २५ दिवस राहिले त्या नंतर परत ते ही पोलिस प्रशासनात रुजू होण्यासाठी नाशिकला गेले.त्या नंतर तहसीलदार पेंदेवाड यांनी १५ ऑगस्ट पासुन पदभार घेतला आहे. परंतु वरील पैकी कोणीच एक महिना सुध्दा कायम राहिले नसल्याने डिजिटल स्वाक्षरी बनवली नाही. त्या मुळे परळी तालुक्यातील जवळपास तीन हजार सातबारा दुरुस्तीचे काम रखडलेले आहे.

पुरवठ्याची डाटा एण्ट्री बंद
     परळी वैजनाथ येथील पुरवठा विभागातील डेटा एन्ट्री सन २०१४ पासून बंद असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच एपीएल,पीएचएच, एएवाय याबाबतीत अडचणी आहेत. परळी वैजनाथ येथील पुरवठा विभागाबाबत संबंधित यंत्रणेला माहिती विचारल्यावर अडीच महिन्यात कोणीच कोणती माहिती देऊ शकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या