इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पंकजाताई मुंडेंनी केले पंतप्रधान मोदींसह शास्त्रज्ञांचं अभिनंदन

 जागतिक महासत्ता बनण्याकडे भारताचं फार मोठं पाऊल


चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल पंकजाताई मुंडेंनी केले पंतप्रधान मोदींसह शास्त्रज्ञांचं अभिनंदन


मुंबई । दिनांक २३।

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान मोहिम यशस्वी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब तर आहेच पण त्याचबरोबर ही कामगिरी भारताची जागतिक महासत्ता बनण्याकडे फार मोठं पाऊल आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांसह भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.


  आज सर्वांच्या आनंदाला त्याचप्रमाणे आपल्या नवीन भारताच्या त्याच्या सन्मानाला आणि त्याने केलेल्या विश्व विक्रमालाही कुठलीही सीमा राहिलेली नाही आपण जगाच्या नव्हे तर आता विश्वाच्या सीमा गाठलेल्या आहेत. देशाच्या इतिहासात पन्नास वर्षे प्रयत्न केल्यानंतर चांद्रयान तीन हे यशस्वी झालं आहे. हा आपल्यासाठी गौरवाचा विषय आहे. देशाचा प्रत्येक नागरिक आज सन्मानाने डौलत आहे. भारत जगाची सत्ता बनण्याकडे हे फार मोठं पाऊल आहे. मी आपल्या सर्वाच्या आनंदात सहभागी आहे. चांद्रयान मोहिम यशस्वी करण्यामागे अनेक हात आहेत, या सर्वांचे तसेच शास्त्रज्ञ आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारचे आणि पंतप्रधान मोदींचं मी अभिनंदन करते असं पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या