इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किसान सभेची मागणी

 अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किसान सभेची मागणी


●खरीप पीक कर्ज माफी व पीक विमा अग्रीम देण्यासाठी करणारा आंदोलन


परळी / प्रतिनिधी


खरीप पिकांचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा देण्यात यावा, अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे खरीप पीक कर्ज माफ करण्यात यावे यासह 

शेतक-याना तातडीने दिलासा देण्या-या विविध मागण्या घेत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या परळी शाखेच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर सोमवार दि 21 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.


बीड आणि परळी तालुक्यातील पर्जन्यमान पाहता मान्सूनचा निम्मा काळ लोटला असून देखील सरासरीच्या निम्मा पाऊस देखील झालेला नाही.खरिपाची लागवड झालेले परळी तालुक्यातील 51 हजार 800 हेक्टर वरील पिके धोक्यात आहेत. अद्याप देखील समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळी सावट माथ्यावर गोगावत असताना शेतक-यांच्या प्रश्नी सातत्याने लढत असलेल्या किसान सभेने या प्रश्नी पुनः पाऊले उचलली असून परळी तालुका दुष्काळ जाहिर करण्याच्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने संबंधीत अहवाल शासनास सादर करून पाठवावा करावा, अवर्षण ग्रस्थ शेतक-याचे खरीप पिक कर्ज माफ करावे,खरीपाचे पिकाची नुकसान झाल्यामुळे पिक विम्याची ५०/टक्के आग्रीम रक्कम शेतक-याच्या खात्या मध्ये जमा करावी,सन २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासुन वंचित शेतक-यांना अनुदानाचे वाटप करावे. सन २०२० चा मंजुर पिक विमा त्वरीत वितरीत करावा.परळी तालुक्यात लंपी स्किन रोगाचे लसी करण युध्द पातळीवर करुन पशु संपत्ती वाचवावी, दुष्काळी परिस्थितीत शेतक-याना शासनाने तातडीने मदत घोषीत करावी.या सह इतर मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभा सोमवार दि. 21 रोजी ठीक 12 वा तहसील कार्यालयासमोर  शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती किसान सभेचे परळी तालुका अध्यक्ष कॉ.भगवान बडे,कॉ.मुक्तेश्वर कडभाने व इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट