दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किसान सभेची मागणी

 अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किसान सभेची मागणी


●खरीप पीक कर्ज माफी व पीक विमा अग्रीम देण्यासाठी करणारा आंदोलन


परळी / प्रतिनिधी


खरीप पिकांचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा देण्यात यावा, अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे खरीप पीक कर्ज माफ करण्यात यावे यासह 

शेतक-याना तातडीने दिलासा देण्या-या विविध मागण्या घेत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या परळी शाखेच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर सोमवार दि 21 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.


बीड आणि परळी तालुक्यातील पर्जन्यमान पाहता मान्सूनचा निम्मा काळ लोटला असून देखील सरासरीच्या निम्मा पाऊस देखील झालेला नाही.खरिपाची लागवड झालेले परळी तालुक्यातील 51 हजार 800 हेक्टर वरील पिके धोक्यात आहेत. अद्याप देखील समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळी सावट माथ्यावर गोगावत असताना शेतक-यांच्या प्रश्नी सातत्याने लढत असलेल्या किसान सभेने या प्रश्नी पुनः पाऊले उचलली असून परळी तालुका दुष्काळ जाहिर करण्याच्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने संबंधीत अहवाल शासनास सादर करून पाठवावा करावा, अवर्षण ग्रस्थ शेतक-याचे खरीप पिक कर्ज माफ करावे,खरीपाचे पिकाची नुकसान झाल्यामुळे पिक विम्याची ५०/टक्के आग्रीम रक्कम शेतक-याच्या खात्या मध्ये जमा करावी,सन २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासुन वंचित शेतक-यांना अनुदानाचे वाटप करावे. सन २०२० चा मंजुर पिक विमा त्वरीत वितरीत करावा.परळी तालुक्यात लंपी स्किन रोगाचे लसी करण युध्द पातळीवर करुन पशु संपत्ती वाचवावी, दुष्काळी परिस्थितीत शेतक-याना शासनाने तातडीने मदत घोषीत करावी.या सह इतर मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभा सोमवार दि. 21 रोजी ठीक 12 वा तहसील कार्यालयासमोर  शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती किसान सभेचे परळी तालुका अध्यक्ष कॉ.भगवान बडे,कॉ.मुक्तेश्वर कडभाने व इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....