इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

शरद पवार विचार मंचाची मागणी

 त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपी दर्शन बंद करा : श्रीनिवास देशमुख




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपीमुळे दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन बंद वैद्यनाथ देवल कमिटीने बंद करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.


शासकीय सुट्या आणि त्यानंतर श्रावण पर्वकाळासाठी होणारी गर्दी पाहता दि. १२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपींना दर्शन दिले जाणार आहे.


सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन येथे येतो, चार ते पाच तास रांगेत उभा राहतो. मात्र, पाच सेंकदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जातो. त्यात २०० रुपये देऊन दोन तास रांगेत उभे राहणारेही असतात. त्र्यंबकेश्वर येथे दररोज १५ हजार भाविकांचे दर्शन होत असते. अवघे चार सेकंद एका भाविकाला मिळतात. त्यात व्हीआयपी आल्यास आणखी पंचाईत होते यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे.


त्याच धर्तीवर परळी वैजनाथ येथेही व्हीआयपीमुळे दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन बंद वैद्यनाथ देवल कमिटीने बंद करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या