शरद पवार विचार मंचाची मागणी
त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपी दर्शन बंद करा : श्रीनिवास देशमुख
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपीमुळे दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन बंद वैद्यनाथ देवल कमिटीने बंद करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
शासकीय सुट्या आणि त्यानंतर श्रावण पर्वकाळासाठी होणारी गर्दी पाहता दि. १२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपींना दर्शन दिले जाणार आहे.
सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन येथे येतो, चार ते पाच तास रांगेत उभा राहतो. मात्र, पाच सेंकदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जातो. त्यात २०० रुपये देऊन दोन तास रांगेत उभे राहणारेही असतात. त्र्यंबकेश्वर येथे दररोज १५ हजार भाविकांचे दर्शन होत असते. अवघे चार सेकंद एका भाविकाला मिळतात. त्यात व्हीआयपी आल्यास आणखी पंचाईत होते यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे.
त्याच धर्तीवर परळी वैजनाथ येथेही व्हीआयपीमुळे दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन बंद वैद्यनाथ देवल कमिटीने बंद करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा