इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

परळीच्या संगीत क्षेत्राचा सर्वोच्च गौरव

 परळीच्या संगीत क्षेत्राचा सर्वोच्च गौरव: भक्ताश्रमच्या गणेशअण्णा चौधरी व सतीशचंद्र चौधरी यांना अ.भा. गांधर्व मंडळाचा मरणोत्तर संगीत रत्न आणि कलागौरव पुरस्कार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       परळी शहराचे संगीत क्षेत्रात गौरवशाली नावलौकिक करणारे परळीतील भक्ताश्रमाचे संस्थापक कै. गणेशअण्णा चौधरी व त्यांचा वारसा पुढे चालवणारे कै. सतीश चंद्र चौधरी यांना अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने दिला जाणारा संगीत क्षेत्रातील गौरवाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अ.भा. गांधर्व मंडळाच्या मरणोत्तर संगीत रत्न आणि कला गौरव पुरस्कारासाठी झालेली ही निवड खरोखरच परळीच्या संगीत क्षेत्राचा मोठा सन्मान आहे.
          परळी नगरीतील भक्ताश्रम हे संगीत साधनेचे एक मौलिक संस्थान आहे. या संस्थांनाचे सर्वेसर्वा शास्त्रीय संगीताचे साधक आणि उपासक कै. अण्णासाहेब चौधरी हे संगीत क्षेत्रातील एक  बडे प्रस्थ होऊन गेले.त्यांनी केलेली संगीत सेवा ही अखिल भारतीय पातळीवर गौरविली गेलेली आहे.
स्व.अण्णांचे जेष्ठ चिरंजीव कै.सतीशचंद्र चौधरी यांनी सुद्धा तबलावादनातील तालयात्री म्हणून केलेली संगीत सेवा ही राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवून गेली.परळीच्या या दोन महान संगीतसाधक  पिता पुत्राला  "अखिल भारतीय गांधर्व मंडळाकडून " स्व. पं. विष्णु दिगंबर पलूस्कर संगीत कलागौरव पुरस्कार जाहीर झाला. त्यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले.
        शास्त्रीय संगीत सेवेला वाहून घेतलेल्या निष्काम आणि निरपेक्ष सेवाव्रत्तीचे जगणेच मुळात हे चिरंतन सेवाभाव संजीवन रहावा यासाठी असते.स्व. अण्णासाहेब आणि स्व. सतीशजी हे संगीत सेवेला स्वतः वाहून घेतलेले समर्पित भाव होते. त्यांचा अखिल भारतीय गांधर्व मंडळाकडून  होणारा मरणोत्तर गौरव परळीसाठी अभिमानास्पद ठरणारा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!