दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण

 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण


बीड (दि. 15) - एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवत बीड जिल्ह्यातील 7751 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन या घटकांसाठी सात कोटी 17 लाख रुपये निधीचे वितरण केले आहे. 


कमी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खरीप हंगामात संकट ओढवले असल्याने धनंजय मुंडे यांनी याआधी देखील सोयाबीन पिकास जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना अग्रीम पीक विमा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाठोपाठ आता ठिबक-तुषारचे अनुदान वितरण झाल्यामुळे याचाही हातभार शेतकऱ्यांना लाभणार आहे. 


बीड जिल्ह्यातील 2019 - 20 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेतील तुषार व ठिबक सिंचनाचे अनुदान वितरण प्रलंबित होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑगस्ट महिन्याच्या मध्यास पावसाची आकडेवारी पाहता हा निधी तातडीने वितरित करण्याबाबत सूचित केले होते. 


धनंजय मुंडे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील 2019-20 पासून ते आज पर्यंत प्रतीक्षेत असलेल्या व पात्र ठरलेल्या 7751 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख 36 हजार रुपये इतका निधी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वितरित करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....