इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण

 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण


बीड (दि. 15) - एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवत बीड जिल्ह्यातील 7751 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन या घटकांसाठी सात कोटी 17 लाख रुपये निधीचे वितरण केले आहे. 


कमी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खरीप हंगामात संकट ओढवले असल्याने धनंजय मुंडे यांनी याआधी देखील सोयाबीन पिकास जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना अग्रीम पीक विमा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाठोपाठ आता ठिबक-तुषारचे अनुदान वितरण झाल्यामुळे याचाही हातभार शेतकऱ्यांना लाभणार आहे. 


बीड जिल्ह्यातील 2019 - 20 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेतील तुषार व ठिबक सिंचनाचे अनुदान वितरण प्रलंबित होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑगस्ट महिन्याच्या मध्यास पावसाची आकडेवारी पाहता हा निधी तातडीने वितरित करण्याबाबत सूचित केले होते. 


धनंजय मुंडे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील 2019-20 पासून ते आज पर्यंत प्रतीक्षेत असलेल्या व पात्र ठरलेल्या 7751 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख 36 हजार रुपये इतका निधी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वितरित करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या