इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण

 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण


बीड (दि. 15) - एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवत बीड जिल्ह्यातील 7751 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन या घटकांसाठी सात कोटी 17 लाख रुपये निधीचे वितरण केले आहे. 


कमी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खरीप हंगामात संकट ओढवले असल्याने धनंजय मुंडे यांनी याआधी देखील सोयाबीन पिकास जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना अग्रीम पीक विमा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाठोपाठ आता ठिबक-तुषारचे अनुदान वितरण झाल्यामुळे याचाही हातभार शेतकऱ्यांना लाभणार आहे. 


बीड जिल्ह्यातील 2019 - 20 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेतील तुषार व ठिबक सिंचनाचे अनुदान वितरण प्रलंबित होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑगस्ट महिन्याच्या मध्यास पावसाची आकडेवारी पाहता हा निधी तातडीने वितरित करण्याबाबत सूचित केले होते. 


धनंजय मुंडे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील 2019-20 पासून ते आज पर्यंत प्रतीक्षेत असलेल्या व पात्र ठरलेल्या 7751 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख 36 हजार रुपये इतका निधी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वितरित करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!